शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

घरकुलाअभावी धानकी कुटुंब अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:15 IST

तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला.

ठळक मुद्देब्लास्टिंगमध्ये कोसळले घर, मुलीचाही मृत्यू : वेकोलि व्यवस्थापनाने दिलेले नुकसानभरपाईचे आश्वासन हवेतच विरले

विनायक येसेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला. यावेळी धानकी कुटुंबाचे छत्र हरपले. त्यामुळे ते गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वास्तव्यास आहेत. मात्र प्रशासनाने अजूनही त्यांना घरकूल दिले नाही.भद्रावती तालुक्यातील चारगाव गावसभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या परिसरातील तेलवासा, ढोरवासा या खाणीमध्ये नेहमीच ब्लास्टिंग होत असते. घटनेच्या दिवशीसुद्धा वेकोलिकडून ब्लास्टिंग करण्यात आली. त्या दिवशी मुलीचे वडील व लहान भाऊ हे बाहेरगावी गेले होते. आईही बाहेर होती. तर मृत मुलगी मेघा धानकी ही आतील खोलीत झोपून होती. वेकोलिची ब्लास्टिंग होताच शेजारी असलेले प्रभाकर वासाडे यांच्या घराची भिंत धानकी यांच्या घरावर पडल्यामुळे त्याचे घर कोसळले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरली. घटनास्थळी, तहसीलदार, पोलीस, वेकोलि अधिकारी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेकोलि अधिकाºयांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने येथील गावकºयांनी शांतपणे मार्ग मोकळा केला.त्याचप्रमाणे तहसीलदारांनीसुद्धा वेकोलिचे तत्कालीन महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांना ही घटना वेकोलिच्या कोळसा ब्लास्टिंगमुळे झाल्याचा अहवाल दिला. यानंतर धानकी कुटुंबाना वाटले की, आता मुलीचा तर जीव गेला परंतु, आपल्याला निवाºयाची सोय वेकोलि करणार. महिना गेला तोपर्यंत गावकºयांनी धानकी कुटुंबाना राहण्यासाठी ग्रामपंचायतमधील कार्यालयातील एक खोली राहण्यासाठी दिली. दिवस गेले, महिना गेला, परंतु, वेकोलि प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यात न आल्याने विजय घागी हे अधिकाºयांच्या कार्यालयात फेºया मारत राहिले. परंतु, त्यांना उडवाउडवीची उत्तर देऊन परत पाठविण्यात येत होते.सततच्या पायपीटीमुळे त्रस्त झाल्याने विजयने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटी घेवून वेकोलिकडून न्याय देण्याची मागणी केली. मंत्र्यांनी अधिकाºयांना पत्र दिले. परंतु, आता अडीच वर्षांचा काळ लोटला असून त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.वेकोलि प्रशासनाने नेहमीप्रमाणे वेळकाढू धोरण राबवून निवारा हपरलेल्या धानकी कुटुंबावर एक प्रकारचा अत्याचार केला आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षापासून या कुंटुबांना ग्रामपंचायत कार्यालयात वास्तव्य करावे लागत आहे.