शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

घरकुलाअभावी धानकी कुटुंब अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:15 IST

तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला.

ठळक मुद्देब्लास्टिंगमध्ये कोसळले घर, मुलीचाही मृत्यू : वेकोलि व्यवस्थापनाने दिलेले नुकसानभरपाईचे आश्वासन हवेतच विरले

विनायक येसेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला. यावेळी धानकी कुटुंबाचे छत्र हरपले. त्यामुळे ते गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वास्तव्यास आहेत. मात्र प्रशासनाने अजूनही त्यांना घरकूल दिले नाही.भद्रावती तालुक्यातील चारगाव गावसभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या परिसरातील तेलवासा, ढोरवासा या खाणीमध्ये नेहमीच ब्लास्टिंग होत असते. घटनेच्या दिवशीसुद्धा वेकोलिकडून ब्लास्टिंग करण्यात आली. त्या दिवशी मुलीचे वडील व लहान भाऊ हे बाहेरगावी गेले होते. आईही बाहेर होती. तर मृत मुलगी मेघा धानकी ही आतील खोलीत झोपून होती. वेकोलिची ब्लास्टिंग होताच शेजारी असलेले प्रभाकर वासाडे यांच्या घराची भिंत धानकी यांच्या घरावर पडल्यामुळे त्याचे घर कोसळले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरली. घटनास्थळी, तहसीलदार, पोलीस, वेकोलि अधिकारी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेकोलि अधिकाºयांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने येथील गावकºयांनी शांतपणे मार्ग मोकळा केला.त्याचप्रमाणे तहसीलदारांनीसुद्धा वेकोलिचे तत्कालीन महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांना ही घटना वेकोलिच्या कोळसा ब्लास्टिंगमुळे झाल्याचा अहवाल दिला. यानंतर धानकी कुटुंबाना वाटले की, आता मुलीचा तर जीव गेला परंतु, आपल्याला निवाºयाची सोय वेकोलि करणार. महिना गेला तोपर्यंत गावकºयांनी धानकी कुटुंबाना राहण्यासाठी ग्रामपंचायतमधील कार्यालयातील एक खोली राहण्यासाठी दिली. दिवस गेले, महिना गेला, परंतु, वेकोलि प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यात न आल्याने विजय घागी हे अधिकाºयांच्या कार्यालयात फेºया मारत राहिले. परंतु, त्यांना उडवाउडवीची उत्तर देऊन परत पाठविण्यात येत होते.सततच्या पायपीटीमुळे त्रस्त झाल्याने विजयने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटी घेवून वेकोलिकडून न्याय देण्याची मागणी केली. मंत्र्यांनी अधिकाºयांना पत्र दिले. परंतु, आता अडीच वर्षांचा काळ लोटला असून त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.वेकोलि प्रशासनाने नेहमीप्रमाणे वेळकाढू धोरण राबवून निवारा हपरलेल्या धानकी कुटुंबावर एक प्रकारचा अत्याचार केला आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षापासून या कुंटुबांना ग्रामपंचायत कार्यालयात वास्तव्य करावे लागत आहे.