शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीचा दंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:23 IST

शेतकºयांनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने पीक उभे केले. उसनवारी व कर्ज काढून शेतीवर अतोनात खर्च केला.

ठळक मुद्दे शेतकरी हवालदिल : पीक नष्ट होण्याचा धोका

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकºयांनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने पीक उभे केले. उसनवारी व कर्ज काढून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र शेतपिकांवर आता अळीचा दंश व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक पूर्णत: नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेती म्हणजे शेतकºयांच्या जिवाची माती, हे ब्रिदवाक्य शेतीची भीषनता दर्शविणारे व शेतकºयांची वास्तविकता मांडणारे आहे. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच शेतकरी पुरता होरपळून गेला आहे. शेतीतून विक्रमी उत्पादन होईल, असे शेतकºयांना वाटत होते. यासाठी शेतकºयांनी शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करून इच्छा मनात नसातानाही पीक उभे केले. मात्र वेळोवेळी निसर्गानेही दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. वेळी अवेळी आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांनी कशीबशी शेती केली. मात्र मोठ्या प्रमाणावर शेतपिकांवर रोगाने प्रादुर्भाव केला आहे. शेतात दिवस-रात्र मेहनत करायची व शेवटी हाती काहीच लागायचे नाही, अशी शेतकºयांची बिकट अवस्था झाली आहे. परंतु, शेतीची ही बिकट अवस्था कार्यालयातील टेबलावर शेतीचा हिशेब मांडणाºयांना काय ठावूक. वातानुकूलीत खोलीत मिनरल वॉटर पिऊन आणि कागदी-घोडे नाचवून शेतीचे खरे वास्तव मांडता येत नाही, हे या अधिकाºयांना सांगणार कोण?शेतकºयांचे अच्छे दिन आणू पाहणारे सरकार आज शेतकºयांचा पाठीशी उभे राहायला तयार नही. निसर्ग साथ देत नाही त्यामुळे शेतीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. कपाशी, सोयाबीन, धान, पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी पुर्णत: खचून गेला आहे.शेतीचे अच्छे दिन कधी येणार ?शेतीचे दिवस आज वाईट आहे. कोरडवाहु शेतीची बिकट अवस्था शब्दात मांडावी तेवढी कमी आहे. शेतीला येत असलेली अवकळा शेतीची अधोगती स्पष्ट करणारी आहे. शेतीचे ‘अच्छे दिन’ येऊन शेतकरी सुखी होणार का, हा खरा प्रश्न आहे.कपाशी, सोयाबीन, धान पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रार्दुभाव वाढला आहे. फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीने दंश केल्याने पीक पुर्णत: उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.- श्रीधर जुनघरीशेतकरी, गोवरी