शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीचा दंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:23 IST

शेतकºयांनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने पीक उभे केले. उसनवारी व कर्ज काढून शेतीवर अतोनात खर्च केला.

ठळक मुद्दे शेतकरी हवालदिल : पीक नष्ट होण्याचा धोका

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकºयांनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने पीक उभे केले. उसनवारी व कर्ज काढून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र शेतपिकांवर आता अळीचा दंश व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक पूर्णत: नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेती म्हणजे शेतकºयांच्या जिवाची माती, हे ब्रिदवाक्य शेतीची भीषनता दर्शविणारे व शेतकºयांची वास्तविकता मांडणारे आहे. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच शेतकरी पुरता होरपळून गेला आहे. शेतीतून विक्रमी उत्पादन होईल, असे शेतकºयांना वाटत होते. यासाठी शेतकºयांनी शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करून इच्छा मनात नसातानाही पीक उभे केले. मात्र वेळोवेळी निसर्गानेही दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. वेळी अवेळी आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांनी कशीबशी शेती केली. मात्र मोठ्या प्रमाणावर शेतपिकांवर रोगाने प्रादुर्भाव केला आहे. शेतात दिवस-रात्र मेहनत करायची व शेवटी हाती काहीच लागायचे नाही, अशी शेतकºयांची बिकट अवस्था झाली आहे. परंतु, शेतीची ही बिकट अवस्था कार्यालयातील टेबलावर शेतीचा हिशेब मांडणाºयांना काय ठावूक. वातानुकूलीत खोलीत मिनरल वॉटर पिऊन आणि कागदी-घोडे नाचवून शेतीचे खरे वास्तव मांडता येत नाही, हे या अधिकाºयांना सांगणार कोण?शेतकºयांचे अच्छे दिन आणू पाहणारे सरकार आज शेतकºयांचा पाठीशी उभे राहायला तयार नही. निसर्ग साथ देत नाही त्यामुळे शेतीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. कपाशी, सोयाबीन, धान, पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी पुर्णत: खचून गेला आहे.शेतीचे अच्छे दिन कधी येणार ?शेतीचे दिवस आज वाईट आहे. कोरडवाहु शेतीची बिकट अवस्था शब्दात मांडावी तेवढी कमी आहे. शेतीला येत असलेली अवकळा शेतीची अधोगती स्पष्ट करणारी आहे. शेतीचे ‘अच्छे दिन’ येऊन शेतकरी सुखी होणार का, हा खरा प्रश्न आहे.कपाशी, सोयाबीन, धान पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रार्दुभाव वाढला आहे. फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीने दंश केल्याने पीक पुर्णत: उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.- श्रीधर जुनघरीशेतकरी, गोवरी