शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ेटॉवरच्या जमिनीचा मोबदला मिळणार

By admin | Updated: November 11, 2016 01:04 IST

शेतकऱ्यांच्या शेतात मोठ-मोठी टॉवर्स उभे केले जात असल्यामुळे जवळपास सहा गुंठे जमीन कायमस्वरूपी वाया जाते.

खांबाला २ लाख ५० हजार देण्याची मागणीचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतात मोठ-मोठी टॉवर्स उभे केले जात असल्यामुळे जवळपास सहा गुंठे जमीन कायमस्वरूपी वाया जाते. काम करताना जवळपास ८ ते १० गुंठे जमिनीवरील पिकांचे नुकसान होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण टॉवर आल्यास त्याला १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावीे, अशी मागणी २०१४ पासून टॉवर विरोधी कृती समितीने वेळोवेली शासनाकडे केली होती. ती मागणी आता मान्य झाली आहे.राज्यात सन २०१० नंतर ४०० के.व्ही. पुढील कामे सुरू झाली. राज्यात प्रामुख्याने १४ जिल्ह्यात ही कामे सुरू आहेत. विद्युत लाईनची कामे करताना टॉवर विरोधी कृती समितीच्या प्रचंड दबावामुळे व पाठपुराव्यामुळे आता शासन निर्णय १ नोव्हेंबर २०१० नुसार, शेतकऱ्यांना टॉवरखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणचे बाजारमूल्य गृहीत धरताना कोरडवाहू, बागायत, फळबागांची जमीन व शहरी भागात तसेच रस्त्यालगत असे वर्गीकरण करण्यात आले आहे. परंतु जमीन अधिग्रहण न करता मोबदला देण्यात येणार आहे. जमिनीचा मोबदला कोरडवाहुला २५ टक्के, बागायतला ५० टक्के, फळबागांना ६० टक्के व रस्त्यालगतच्या जागेला ६५ टक्के असे वर्गीकरण केले असून ते योग्य नाही. सरसकट २० गुंठे जमिनीचे नुकसान गृहीत धरून मोबदला द्यावा यासाठी शासन निर्णयात बदल करावा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास कमीत कमी ७५० व जास्तीत जास्त १२०० टॉवर्स आलेले आहेत. यामुळे ६ ते ८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर आले नाही. फक्त तार गेली असेल तर बागायत शेती असल्यास २ लाख रुपये व कोरडवाहू शेती असल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मंजूर करण्याचा शासनाचा विचार आहे. जर फक्त रस्ता गेला असेल तर १०० फुट लांबी पर्यंत ५० हजार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)