शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा तलाव सांडपाण्यामुळे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:35 IST

चंद्रपूर : येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित असल्याचे ...

चंद्रपूर : येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले असून तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहे. विशेष म्हणजे, घरगुती सांडपाणी वाहून नेणारे बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही. त्यामुळे काही प्रमाणात अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी तलावामध्ये, लगतच्या नदीमध्ये जाते व उर्वरित अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी जमिनीमध्ये मुरून भूजलसुद्धा प्रदूषित होत असल्याचेही म्हटले आहे. ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण करून सौंदर्यीकरण करण्याच्या मागणीला घेऊन इको-प्रोच्यावतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. यासंदर्भात इको- प्रोच्या निवेदनाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला सूचना दिल्या आहेत.

रामाळा तलावाच्या खोलीकरण तसेच सौंदर्यीकरणाबाबत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. बैठकीदरम्यान घरगुती सांडपाणी नाल्याद्वारे तलावामध्ये जाते. तसेच तलाव भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओसंडून लगतच्या झरपट नदीमध्ये मिसळते. झरपट नदी पुढे वाहून इरई नदीत मिसळते, असे स्पष्ट दिसून आले.

राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्लीच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरातून निर्मित १०० टक्के घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया सयंत्रणा उभारणे, शहरामध्ये बंदिस्त गटार नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेकडे शहरामधील निर्मित घरगुती सांडपाणी वाहून नेणाऱ्या बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही. त्यामुळे ऐतिहासिक रामाळा तलावात येणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत आहे.

कोट

भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे, हे स्पष्ट आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक नागरिक मंडपात येऊन तक्रार करीत आहे. तलावातील आणि परिसरातील भूजल प्रदूषित होऊन सुद्धा नगर व जिल्हा प्रशासन गंभीर दिसून येत नाही, याकडे नागरिकांनी आता भूमिका घेणे आवश्यक आहे.

- बंडू धोतरे

अध्यक्ष, इको- प्रो.