शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

लेंडीगुड्यात खड्ड्यातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 00:36 IST

पाणी टंचाईमुक्त गाव करण्यासाठी शासन पाण्यासारखा खर्च करीत असले तरी आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कायमस्वरूपी योजनेची गरजशंकर चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पाणी टंचाईमुक्त गाव करण्यासाठी शासन पाण्यासारखा खर्च करीत असले तरी आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने लेंडीगुडा या गावात भेट देऊन पाणी टंचाईचे उग्र रूप समोर आणले आहे. पावसाळा जवळ आला असला तरी तालुका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही. केवळ उडवाउडवीचे उत्तर देत चालढकल केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाल्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील लेंडीगुडा गावातील या छोट्याशा वस्तीत मागील चार महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्याचे स्त्रोत असलेले दोन्ही हातपंप बंद अवस्थेत आहे. वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीचे काम थंडबस्त्यात आहे. जवळपास पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही. संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुठलीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. गावपातळीवरील समस्या व त्यांचे प्रश्न तातडीने सोडविता यावे, यासाठी शासनाने ग्रामपंचायतीची स्थापना केली आहे. पण या संस्थेलाच पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य लक्षात येत नसेल तर जनतेनी न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न आहे.मागील अनेक वर्षापूर्वी जलस्वराज्य प्रकल्प, ग्रामीण पाणी पुरवठा यासारख्या महत्वाच्या योजना शासनाने राबविल्या. यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु त्या योजनेतून घोटभर पाणीही प्यायला मिळाले नाही. काहीअंशी पिण्याच्या पाण्याची सोय होईल, असे वाटत होते. मात्र चुकीचे नियोजन आणि योजनेवरील तांत्रिक सल्लागाराचे अक्षम्य दुर्लक्ष व गावपातळीवरील हेवेदावे, यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला असून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम भेडसावत आहे.दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारवर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी अनेक वेळा मागणी केल्यानंतरही शासन प्रशासनाने घोटभर पाण्याची सोय करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे येथील बांधवांना नाल्यात खड्डा खोदून दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजारालाही बळी पडावे लागत असल्याचे बोलले जात आहे.