शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लेंडीगुड्यात खड्ड्यातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 00:36 IST

पाणी टंचाईमुक्त गाव करण्यासाठी शासन पाण्यासारखा खर्च करीत असले तरी आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कायमस्वरूपी योजनेची गरजशंकर चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पाणी टंचाईमुक्त गाव करण्यासाठी शासन पाण्यासारखा खर्च करीत असले तरी आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने लेंडीगुडा या गावात भेट देऊन पाणी टंचाईचे उग्र रूप समोर आणले आहे. पावसाळा जवळ आला असला तरी तालुका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही. केवळ उडवाउडवीचे उत्तर देत चालढकल केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाल्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील लेंडीगुडा गावातील या छोट्याशा वस्तीत मागील चार महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्याचे स्त्रोत असलेले दोन्ही हातपंप बंद अवस्थेत आहे. वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीचे काम थंडबस्त्यात आहे. जवळपास पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही. संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुठलीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. गावपातळीवरील समस्या व त्यांचे प्रश्न तातडीने सोडविता यावे, यासाठी शासनाने ग्रामपंचायतीची स्थापना केली आहे. पण या संस्थेलाच पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य लक्षात येत नसेल तर जनतेनी न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न आहे.मागील अनेक वर्षापूर्वी जलस्वराज्य प्रकल्प, ग्रामीण पाणी पुरवठा यासारख्या महत्वाच्या योजना शासनाने राबविल्या. यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु त्या योजनेतून घोटभर पाणीही प्यायला मिळाले नाही. काहीअंशी पिण्याच्या पाण्याची सोय होईल, असे वाटत होते. मात्र चुकीचे नियोजन आणि योजनेवरील तांत्रिक सल्लागाराचे अक्षम्य दुर्लक्ष व गावपातळीवरील हेवेदावे, यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला असून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम भेडसावत आहे.दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारवर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी अनेक वेळा मागणी केल्यानंतरही शासन प्रशासनाने घोटभर पाण्याची सोय करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे येथील बांधवांना नाल्यात खड्डा खोदून दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजारालाही बळी पडावे लागत असल्याचे बोलले जात आहे.