शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

लाखो गुरुदेव भक्तांनी घेतले तपोभूमीचे दर्शन

By admin | Updated: January 5, 2015 23:00 IST

दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील

चिमूर : दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व गुरुदेव भक्त ५ जानेवारीला आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून राष्ट्रसंताच्या तपोभूमीचे दर्शन घेतात. परंतु, या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार अशी माहिती मिळाल्यामुळे असंख्य गुरुदेव भक्तांनी तपोभूमीत उपस्थिती दर्शविली. राष्ट्रसंताना भारतरत्न पुरस्कार मिळणार अशी आशा बाळगुण आपल्या लहान मुलांसह बैलबंडी, पायदड तथा वेगवेगळ्या साधनांनी या तपोभूमीत भक्त उपस्थित झाले. परंतु, राज्याचा एकही मंत्री न आल्यामुळे गुरुदेव भक्त तीव्र नाराज झाले. गुरुदेव भक्तांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन देऊन त्यांनी चिमूर व गोंदोडा परिसरात अनेक ठिकाणी फलक लावले. त्यामुळे गुरुदेव भक्तांना आमदाराकंडून आशा आहे.अवघ्या लहान वयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गोंदोडा या जंगल परिसरात तपश्चर्या केली. नेरी परिसरात अनेक गुरुदेव भक्तांना एकत्रीत करुन ग्रामपंचायत नेरी चे उद्घाटन केले. त्यांनी आपल्या काळात आरोग्यसेवा दिली. गोंदोडा परिसरात तालुक्यातील गुरुदेव भक्तांना एकत्रीत आणून एक मोठी यात्रा भरविली. त्या यात्रेत तुकडोजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्म समभावचा संदेश दिला. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ‘झाड झडूली शस्त्र बनेंग,े भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नान लगेगी किनारे’ असा मंत्र देत देशाला स्वातंत्र मिळवून दिले. सर्वात प्रथम देशामध्ये चिमूर हे गाव स्वतंत्र झाले. परंतु त्याच व्यक्तीचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी समोर येत नाही. राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, ते चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. तसेच ज्यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न मिळावा याचा पाठपुरावा केला ते जिल्ह्याचे पालकमंत्री असून राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे गुरुदेव भक्तांना यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तपोभूमीमध्ये दर्शन घेण्यासाठी व राष्ट्रसंताना भारतरत्न मिळावा म्हणून गावागावातील लहानांपासून ते वृद्धापर्यंत संपूर्ण भक्त पायदळ, बैलबंडी, तपोभूमीत पोहचले. परंतु एकही मंत्री न आल्यामुळे त्यांची निराशा झाली. (तालुका प्रतिनिधी)