शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सिंदेवाही तालुक्यात स्वच्छतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

सन २००९ ते २०१० पासून राज्यात गाव स्वच्छता मोहिमेतंर्गत अनेक गावे हागणदारीमुक्त करून पारितोषिक बहाल करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाकडून ...

सन २००९ ते २०१० पासून राज्यात गाव स्वच्छता मोहिमेतंर्गत अनेक गावे हागणदारीमुक्त करून पारितोषिक बहाल करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाकडून योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. हागणदारी मुक्त झालेल्या गावात प्रत्यक्ष फेरफटका मारला असता स्वच्छ भारत मोहिमेकडे दुर्लक्ष होऊन हागणदारी मुक्त मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने गाव कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होणे सहाजिकच आहे. परंतु, प्रशासनाच्या शासकीय अधिकाऱ्यांचे या योजनेकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. हागणदारी मुक्त अनुदान गावाच्या स्वच्छतेकडे देखभाल व इतर विकास कामावर खर्च होणे गरजेची असताना एखादा पारितोषिक मिळाली की, पुन्हा योजनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होते. घरोघरी स्वच्छालय असताना अनेक नागरिक गावातून निघणाऱ्या रोडच्या बाजूला उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र दिसून येते. अशाविरोधात कारवाई करणे गरजेचे आहे.