शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

दुष्काळग्रस्त यादीत सहभाग न होणे हा जिल्ह्यावर अन्याय

By admin | Updated: May 24, 2016 01:17 IST

जिल्ह्यातील एक हजार २७६ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झाला नाही.

वडेट्टीवारांचे प्रशासनाला पत्र : कर्ज पुनर्गठनाअभावी शेतकरी संकटात चंद्रपूर : जिल्ह्यातील एक हजार २७६ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झाला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना पुन्हा संकटाच्या खाईत लोटण्याचे काम सरकारने केले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला.आमदार वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने २२ मार्चला दुष्काळग्रस्त गावांना ३६० कोटी रूपयांचा दुष्काळ निधी वाटप केला. मात्र तेव्हा जिल्हा चंद्रपूर निल दाखविण्यात आल्याने छदामही मदत मिळू शकली नाही. नंतरच्या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाहणीनंतर जिलह्यातील एक हजार २७६ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी आली. तसा अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र जिल्ह्याचा उल्लेख दुष्काळग्रस्त यादीत तर सोडा दुष्काळसदृष्ष्य गावांच्या यादीतही झाला नाही. जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा समावेश यात झाला असता तर दुष्काळात मिळणारी मदत येथील शेतकऱ्यांना मिळाली असती. त्यातून कोलमडलेला शेतकरी उभा राहू शकला असता. शेतकऱ्यांचा हंगाम तोंडावर येत आहे. मात्र अद्यापही कृषीकर्जासाठी राष्टीयकृत बँकांना सरकारने पैसा दिलेला नाही. ३७ टक्के शतकरी अद्यापही कर्ज वाटपापासून वंचित आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आजपर्यंत फक्त ४३ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जपुरवठा झाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन न झाल्याने शेतकरी कर्जापासून वंचित आहे. नाईलाजाने त्यांना सावकाराच्या दाराशी जाण्यासाठी राज्य सरकारच भाग पाडत आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नैराश्य आल्याने त्याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, सोमवारी सकाळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेवून परिस्थिती मांडली. बँकांची बैठक घेवून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे निर्देश देण्याची आणि ५० टक्के सबसिडीवर बियाणे देण्यासाठी सरकारकडे सिफारस करण्याची मागणी त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)