शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरपंचांनीच ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:14 IST

सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे.

ठळक मुद्देपाचगाव येथील घटना : शासकीय विकासकामांचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीचे सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे.राजुरा तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. मागील महिन्यात येथील सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची बोंब ताजी असतानाच येथील सरपंच रसिका उदे यांनी दोन दिवसांपूर्वी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकले. मात्र असे कुलूप लावण्याविषयी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. किंवा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत असा कोणताच ठराव घेण्यात आला नाही. मग गावाचा प्रथम नागरिक असतानाही सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामपंचायतीला दोन दिवसांपासून कुलूप असल्याने ग्रा.प. कार्यालयातून होणारे सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद पडला असून गावकºयांचा पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. गावकºयांना व विद्यार्थ्यांना लागणारे रहिवासी दाखले ना हरकत प्रमाणपत्र व ग्रामपंचायतीचे सर्वच शासकीय कामांचा खोळंबा झाला असून शासकीय कामात सरपंच अडथळा आणत असल्याचा आरोप उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी केला आहे. सरपंचांवर कारवाई करुन अपात्र घोषित करावे, अशी मागणी उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी जिल्हाधिकाºयाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. याबाबत सरपंच रसिका उदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.गावाचा प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांनीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. याबाबत कुणालाही माहिती दिली नाही किंवा कुणाची परवानगीही घेतली नाही. हे सर्व काम नियमबाह्य असून ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार ठप्प पडले असून सरपंचावर कडक कारवाई करावी.- गोपाल जंबूलवार, उपसरपंच,पाचगाव