शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:30 IST

रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा रूग्णालयात केलेली नसल्यामुळे अनेक रूग्णांची हेडसांड होत आहे.

ठळक मुद्देरुग्णांची हेळसांड : रुग्णांना करतात रेफर टू चंद्रपूर

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा रूग्णालयात केलेली नसल्यामुळे अनेक रूग्णांची हेडसांड होत आहे. बहुतांश रूग्णांना रेफर टू चंद्रपूर, गडचिरोली केले जात आहे. रूग्णांची होणारी हेडसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र आरोग्य विकास प्रकल्पांतर्गत येथील ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात आलेले आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दिग्वीजय खानविलकर यांच्या हस्ते सदर रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा ५ मे २००२ रोजी मोठया दिमाखात पार पडला. यावेळी तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री एकनाथराव गायकवाड उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सदर रूग्णालयात स्त्रि रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, शल्यचिकीत्सक हे महत्वाचे पद नेहमीसाठी भरण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु सहा वर्षांचा कार्यकाळ लोटून गेला. मात्र अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली नाही.येथील उपजिल्हा रूग्णात डॉ. सुर्यकांत बाबर हे वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत आहे, तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उज्वलकुमार इंदूरकर, डॉ. चंद्रागडे, डॉ. मेश्राम हे कर्तव्य बजावित आहे. चिमूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवतकर यांची मूल उपजिल्हा रूग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आलेली नाही. सदर रूग्णालयात रोज किमान दोनशे ते अडीचशेच्या जवळपास रूग्णांची नोंदणी होत आहे.रूग्णालयात आयुष क्लिनीक कार्यरत आहे. आयुष क्लिनीकमधील डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार केला जात आहे. उपजिल्हा रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टराअभावी रूग्णांवर योग्य उपचार होत नाही. काही रूग्णांना चंद्रपूर व इतर ठिकाणी रेफर करावे लागते. यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करणे गरजेचे आहे.रुग्णांसोबत वाईट वागणूकग्रामीण भागातील रूग्ण मोठया प्रमाणावर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ येत असतात. मात्र येथील काही डॉक्टर रूग्णांशी सामंजस्याने बोलत नसल्याने डॉक्टरांप्रति तिव्र रोष व्यक्त केला जात आहे. तब्बल ११ वर्षानंतर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांचे पद कायमस्वरूपी भरण्यात आलेले आहे. रूग्णालय प्रशासन साभाळण्याची संपुर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिक्षकांची असते, त्यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल