शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

नरेगाचे मजूर वेतनापासून वंचित

By admin | Updated: August 9, 2014 01:36 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला जशी शंभर दिवस कामाची हमी आहे, तसेच मजुराची मजुरी मस्टर बंद झाल्यावर १५ दिवसात दिली पाहिजे, असे बंधन आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला जशी शंभर दिवस कामाची हमी आहे, तसेच मजुराची मजुरी मस्टर बंद झाल्यावर १५ दिवसात दिली पाहिजे, असे बंधन आहे. मात्र चिमूर पंचायत समिती कार्यालयातील दप्तर दिरंगाईने अनेक मजूर अनेक महिन्यापासून पगारापासून वंचित झाले आहे. तर अनेक शेतकरी विंधन विहीरीच्या अनुदानापासून वंचित झाले आहेत.राज्यातील मजुराला शंभर दिवस गॅरेंटेड काम मिळावे याकरिता शासनाने (नरेगा) योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पांदन रस्ते, शेततळे, विंधन विहीरी, वैयक्तीक शौचालये, वृक्ष लागवड असे अनेक प्रकारचे काम मजुरामार्फत केली जातात. त्यामुळे गावातील अनेक मजुरांना या योजनेतून रोजगार मिळाला आहे.रोजगार हमीवरील मजुराची नोंदणी आणि जॉबकार्ड त्यांना दिले जाणारे वेतन बँक अथवा पोस्टाद्वारे देण्यात येते. साप्ताहिक वेतन मशिनरी व कंत्राटदाराला बंदी, हजेरी पटाची पडताळणी आणि सामाजिक अंकेक्षण आदी बाबीमुळे नरेगा योजना पादर्शक असली तरी चिमूर पंचायत समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामावरील मजूर व शेततळे विहीरीचे लाभार्थी काम करुनही लाभपासून अनेक महिन्यापासून वंचित झाले आहेत.मागील व चालू वर्षात चिमूर पंचायत समिती अंतर्गत २६२७ मस्टर पगारबंद झाले आहेत. त्यापैकी अजूनही ८६९ मस्टरने पगार मजुरांना मिळणे बाकी आहे. त्यामुळे या ८६९ मस्टरवरील मजूर अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित झाले. त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. मजुराची मजुरी मस्टर बंद झाल्यावर १५ दिवसात दिली पाहिजे, असा नियम आहे. मजुरी १५ दिवसात न दिल्यास होणाऱ्या विलंबासाठी देय मजुरीवर ०.०५ टक्के नुकसान भरपाई मजुराला देय ठरते. त्यामुळे विलंबाने मजुरी देताना मजुरीसोबत नुकसान भरपाई रक्कमसुद्धा संबंधित मजुराच्या बँक वा पोस्ट खात्यात जमा करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांना नुकसान भरपाईचा आकडा मोठा असून विलंबापोटी नुकसान भरपाई ३०,८९,८९९ रुपये देण्यात येणार आहे. मजुरांना विलंबाने मजुरी देण्याकरिता दोषी असलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या पगारातून वसुली करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र ३१ जुलै २०१४ च्या आदेशानुसार शासनाने पगारातून वसुली करण्याला ३१ डिसेंबर २०१४ पासून मुदतवाढ दिली आहे. आता १ जानेवारी २०१५ पासून विलंबाची रक्कम अधिकारी कर्मचाऱ्याच्या पगारातून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे चिमूर पंचायत समिती अंतर्गत नरेगाच्या मजुरांना देण्यात येणाऱ्या पगाराला अनेक महिन्याचा विलंब होत आहे.