शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कुकुडसाथ गावाने विकास कामात घेतली आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:55 IST

कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीच्या आठव्या दिवशीची सुरूवात जिवती तालुक्यातील कोलांडी गावापासून करण्यात आली. वृक्षदिंडी कोलांडी, कुंभेझरी गावातून वाजतगाजत निघाली. कुकुडसाथ व नारंडा गावात पोहोचल्यानंतर वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. दिंडीसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे जिल्हा परिषद सदस्य कमला राठोड, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकाते, पंचायत समिती सदस्य अंजना पवार, कोरपना तालुक्यात दिंडीसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोडापे, आशिष ताजणे व गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. शाम रणदिवे म्हणाले, ग्राम विकास हा पैशानी होत नाही. याला सुसंवादाची गरज असते. ग्रामसविकासाचा संवाद कुकुडसाथ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भुजंग सुर्यवंशी यांनी गावात घडवून आणला. दिंडी दरम्यान गावस्तरावर विविध विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. नारंडा गावात ही दिंडी बैलगाडीवर सजवून गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली. गावात भव्य विराट दिंडीचे स्वरुप निर्माण झाले. यावेळी जिवती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बागडे, कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान