शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

कोविडमुळे २५७ बालकांचे एक, तर सात जणांचे दोन्ही पालक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

चंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील २५७ बालकांचे एक पालक आणि सात जणांचे दोन्ही पालक दगावले. पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व ...

चंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील २५७ बालकांचे एक पालक आणि सात जणांचे दोन्ही पालक दगावले. पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरुवारी आढावा घेऊन संबंधित विभागाला तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा सहायक आयुक्त विद्द्‌या पाटील, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा जामदार, महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पालक गमाविलेल्या सर्व बालकांची स्वतंत्र फाईल तयार करावी. जेणेकरून परिपूर्ण प्रस्ताव तयार होऊन शासकीय योजनेचा लाभ देताना अडचण येणार नाही. प्रत्यक्ष भेटीदरम्यान निरीक्षणात आलेल्या बाबी, आर्थिक परिस्थिती व चर्चेतून मिळालेली सर्व माहिती फाईलमध्ये नोंदवावी. स्थावर मालमत्तेसंदर्भात ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तर शहरी भागात संबंधित नगरपरिषदेला कळवावे. दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या स्थावर व इतर मालमत्तांबाबत जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, ज्या सात बालकांच्या दोन्ही पालकांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात बँकांना कळवावे. एक पालक गमाविलेल्या कुटुंबाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.

पालक गमावलेली बालके...

कोविडमुळे जिल्ह्यातील सात बालकांनी दोन्ही पालक गमाविले. त्यामध्ये चंद्रपूर व चिमूर येथील प्रत्येकी तीन बालके आणि सावली येथील एका बालकाचा समावेश आहे. एक पालक गमाविलेल्या बालकांची संख्या २५७ आहे. बालकल्याण समितीसमोर २६४ बालकांची यादी पुढील कार्यवाहीकरिता सादर करण्यात आली. यापैकी सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेसाठी मंजूर प्रकरणांची संख्या ३२ असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.