शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

कोतवालांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:55 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने फिरवली पाठ : प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.३० डिसेंबरपर्यंत कोतवालांना चतूर्थ श्रेणीत समाविष्ट करावे, अशी प्रमुख मागणी कोतवाल संघटनेने केली आहे. कोतवाल हा महसुल विभागाचा प्रमुख घटक अहे. मात्र अल्प मानधन दिल्या जाते. कमी मानधनात कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. कोतवालांना महसुल गोळा करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुचना देणे, नोटीस तामील करणे, कृषी गणना, संगणक सातबारा रेकार्ड तसेच निवडणुकीच्या काळात अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात. कोतवालांना चतूर्थ श्रेणी मिळावी, यासाठी आंदोलने करून शासनाला वेळोवेळी निवेदन दिली. पण मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोतवाल संघटनेने केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर राज्य संघटनेच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली.राजुऱ्यातही आंदोलनराजुरा : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखेकडून राज्य कोतवाल संघटनाद्वार २१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चा व उपोषण करून शासनाला निवेदन देण्यात आले. मागील ५० वर्षांपासून कोतवालांना न्याय मिळाला नाही. शासनाची विविध कामे करूनही त्यांची उपेक्षा केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला. वारंवार पाठपुरावा करूनही उपेक्षा वाटल्याला येत असल्याने राज्य कोतवाल संघटनेच्या नेतृत्व बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. कोतवालच्या वारसांना पेंशन लागू करण्यात यावे, लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चेन्नूरवार, सचिव मारोती मेश्राम यांनी निवेदनात नमूद केली आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असल्याने तालुक्यातील अनेक कामांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तलाठ्यांची महत्त्वपूर्ण कामे रखळली आहेत.