शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:55 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने फिरवली पाठ : प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.३० डिसेंबरपर्यंत कोतवालांना चतूर्थ श्रेणीत समाविष्ट करावे, अशी प्रमुख मागणी कोतवाल संघटनेने केली आहे. कोतवाल हा महसुल विभागाचा प्रमुख घटक अहे. मात्र अल्प मानधन दिल्या जाते. कमी मानधनात कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. कोतवालांना महसुल गोळा करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुचना देणे, नोटीस तामील करणे, कृषी गणना, संगणक सातबारा रेकार्ड तसेच निवडणुकीच्या काळात अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात. कोतवालांना चतूर्थ श्रेणी मिळावी, यासाठी आंदोलने करून शासनाला वेळोवेळी निवेदन दिली. पण मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोतवाल संघटनेने केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर राज्य संघटनेच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली.राजुऱ्यातही आंदोलनराजुरा : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखेकडून राज्य कोतवाल संघटनाद्वार २१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चा व उपोषण करून शासनाला निवेदन देण्यात आले. मागील ५० वर्षांपासून कोतवालांना न्याय मिळाला नाही. शासनाची विविध कामे करूनही त्यांची उपेक्षा केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला. वारंवार पाठपुरावा करूनही उपेक्षा वाटल्याला येत असल्याने राज्य कोतवाल संघटनेच्या नेतृत्व बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. कोतवालच्या वारसांना पेंशन लागू करण्यात यावे, लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चेन्नूरवार, सचिव मारोती मेश्राम यांनी निवेदनात नमूद केली आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असल्याने तालुक्यातील अनेक कामांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तलाठ्यांची महत्त्वपूर्ण कामे रखळली आहेत.