शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कोतवालांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:55 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने फिरवली पाठ : प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.३० डिसेंबरपर्यंत कोतवालांना चतूर्थ श्रेणीत समाविष्ट करावे, अशी प्रमुख मागणी कोतवाल संघटनेने केली आहे. कोतवाल हा महसुल विभागाचा प्रमुख घटक अहे. मात्र अल्प मानधन दिल्या जाते. कमी मानधनात कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. कोतवालांना महसुल गोळा करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुचना देणे, नोटीस तामील करणे, कृषी गणना, संगणक सातबारा रेकार्ड तसेच निवडणुकीच्या काळात अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात. कोतवालांना चतूर्थ श्रेणी मिळावी, यासाठी आंदोलने करून शासनाला वेळोवेळी निवेदन दिली. पण मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोतवाल संघटनेने केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर राज्य संघटनेच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली.राजुऱ्यातही आंदोलनराजुरा : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखेकडून राज्य कोतवाल संघटनाद्वार २१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चा व उपोषण करून शासनाला निवेदन देण्यात आले. मागील ५० वर्षांपासून कोतवालांना न्याय मिळाला नाही. शासनाची विविध कामे करूनही त्यांची उपेक्षा केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला. वारंवार पाठपुरावा करूनही उपेक्षा वाटल्याला येत असल्याने राज्य कोतवाल संघटनेच्या नेतृत्व बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. कोतवालच्या वारसांना पेंशन लागू करण्यात यावे, लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चेन्नूरवार, सचिव मारोती मेश्राम यांनी निवेदनात नमूद केली आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असल्याने तालुक्यातील अनेक कामांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तलाठ्यांची महत्त्वपूर्ण कामे रखळली आहेत.