शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:58 IST

येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही.

ठळक मुद्देनवीन योजनेला वीज पुरवठा करण्यास महावितरणचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही. थकित वीज देयके भरण्यास ग्रा.पं. तयार असतानाही वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित ठेवून गावकºयांना पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून गावात तीव्र संताप पसरला आहे.वीज वितरण कंपनीचे कोठारी ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेचे तीन लक्ष देयक थकीत आहे. सन २००८ पासून वीज वितरण कंपनीच्या कोठारी येथील ३३ केव्ही. सब स्टेशन व कर्मचारी निवासस्थान वसाहत हजारो फूटात बसली आहे. यावर ग्रा.पं.ने सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी आकारण्यात आलेल्या करापेक्षा कमी दराची आकारणी केली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे थकीत कराचा भरणा केलेला नाही. तेरा लक्ष रुपये महावितरणकडे थकीत आहेत. त्यासाठी ग्रा.पं.ने अनेकदा पत्रव्यवहार करुन थकीत कराचा भरणा करण्यासाठी विनंती केली. मात्र आकारणी दर जास्त असल्याचा कांगावा करुन थकीत कर भरण्यासाठी महावितणने असमर्थता दर्शविली आहे.कोठारी गावाची वाढती लोकसंख्येमुळे जुनी नळ योजना अपुरी पडत असल्याचा विचार करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी खनीज विकास निधीअंतर्गत विशेष बाब म्हणून ३ करोड ५० लक्ष रुपयाची वर्धा नदीवर नवीन नळ योजना मंजूर केली. नवीन नळयोजनेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र वीज पुरवण्यासाठी प्रतीक्षा लागून आहे. त्यासाठी संबधीत विभागाने वीज कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वीज पुरवठा करण्यासाठी सांगितले. मात्र वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे वीज देयक थकीत असून त्याचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा करण्यात येणार नसल्याचे ग्रा.पं.ला सांगितले. परंतु ग्रा.पं.चा वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपये कर रुपात थकीत असून वीज कंपनीने थकिता देण्याची रक्कम कपात करावी व वीज पुरवठा करण्यास पत्र दिले.त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं. कमिटीने संयुक्त बैठक घेवून तडजोड करीत तीन लक्ष ३५ हजार भरण्याचे ठरले असता पुन्हा वीज मंडळाने ५ लक्ष ८६ हजार रुपये भरण्याचे पत्र दिले आहे. वीज मंडळाच्या अशा दुटप्पी व अडेलतट्टू धोरणाने गावकरी संतापले असून वीज कंपनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला असल्याचा सूर उमटत आहे.गावकºयांचा आंदोलनाचा इशारादहा वर्षांपासून कोठारीची जनता पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. नवीन नळयोजना पूर्णत्वास आली, मात्र वीज पुरवठा महावितरण कंपनी करीत नसल्याने गावकºयांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा करुन गावकºयांना पाणी पुरवठा न केल्यास कोठारीचे नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रा.पं. उपसरपंच अमोल कातकर यांनी दिला आहे.