शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:58 IST

येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही.

ठळक मुद्देनवीन योजनेला वीज पुरवठा करण्यास महावितरणचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही. थकित वीज देयके भरण्यास ग्रा.पं. तयार असतानाही वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित ठेवून गावकºयांना पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून गावात तीव्र संताप पसरला आहे.वीज वितरण कंपनीचे कोठारी ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेचे तीन लक्ष देयक थकीत आहे. सन २००८ पासून वीज वितरण कंपनीच्या कोठारी येथील ३३ केव्ही. सब स्टेशन व कर्मचारी निवासस्थान वसाहत हजारो फूटात बसली आहे. यावर ग्रा.पं.ने सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी आकारण्यात आलेल्या करापेक्षा कमी दराची आकारणी केली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे थकीत कराचा भरणा केलेला नाही. तेरा लक्ष रुपये महावितरणकडे थकीत आहेत. त्यासाठी ग्रा.पं.ने अनेकदा पत्रव्यवहार करुन थकीत कराचा भरणा करण्यासाठी विनंती केली. मात्र आकारणी दर जास्त असल्याचा कांगावा करुन थकीत कर भरण्यासाठी महावितणने असमर्थता दर्शविली आहे.कोठारी गावाची वाढती लोकसंख्येमुळे जुनी नळ योजना अपुरी पडत असल्याचा विचार करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी खनीज विकास निधीअंतर्गत विशेष बाब म्हणून ३ करोड ५० लक्ष रुपयाची वर्धा नदीवर नवीन नळ योजना मंजूर केली. नवीन नळयोजनेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र वीज पुरवण्यासाठी प्रतीक्षा लागून आहे. त्यासाठी संबधीत विभागाने वीज कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वीज पुरवठा करण्यासाठी सांगितले. मात्र वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे वीज देयक थकीत असून त्याचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा करण्यात येणार नसल्याचे ग्रा.पं.ला सांगितले. परंतु ग्रा.पं.चा वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपये कर रुपात थकीत असून वीज कंपनीने थकिता देण्याची रक्कम कपात करावी व वीज पुरवठा करण्यास पत्र दिले.त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं. कमिटीने संयुक्त बैठक घेवून तडजोड करीत तीन लक्ष ३५ हजार भरण्याचे ठरले असता पुन्हा वीज मंडळाने ५ लक्ष ८६ हजार रुपये भरण्याचे पत्र दिले आहे. वीज मंडळाच्या अशा दुटप्पी व अडेलतट्टू धोरणाने गावकरी संतापले असून वीज कंपनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला असल्याचा सूर उमटत आहे.गावकºयांचा आंदोलनाचा इशारादहा वर्षांपासून कोठारीची जनता पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. नवीन नळयोजना पूर्णत्वास आली, मात्र वीज पुरवठा महावितरण कंपनी करीत नसल्याने गावकºयांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा करुन गावकºयांना पाणी पुरवठा न केल्यास कोठारीचे नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रा.पं. उपसरपंच अमोल कातकर यांनी दिला आहे.