शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:58 IST

येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही.

ठळक मुद्देनवीन योजनेला वीज पुरवठा करण्यास महावितरणचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही. थकित वीज देयके भरण्यास ग्रा.पं. तयार असतानाही वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित ठेवून गावकºयांना पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून गावात तीव्र संताप पसरला आहे.वीज वितरण कंपनीचे कोठारी ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेचे तीन लक्ष देयक थकीत आहे. सन २००८ पासून वीज वितरण कंपनीच्या कोठारी येथील ३३ केव्ही. सब स्टेशन व कर्मचारी निवासस्थान वसाहत हजारो फूटात बसली आहे. यावर ग्रा.पं.ने सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी आकारण्यात आलेल्या करापेक्षा कमी दराची आकारणी केली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे थकीत कराचा भरणा केलेला नाही. तेरा लक्ष रुपये महावितरणकडे थकीत आहेत. त्यासाठी ग्रा.पं.ने अनेकदा पत्रव्यवहार करुन थकीत कराचा भरणा करण्यासाठी विनंती केली. मात्र आकारणी दर जास्त असल्याचा कांगावा करुन थकीत कर भरण्यासाठी महावितणने असमर्थता दर्शविली आहे.कोठारी गावाची वाढती लोकसंख्येमुळे जुनी नळ योजना अपुरी पडत असल्याचा विचार करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी खनीज विकास निधीअंतर्गत विशेष बाब म्हणून ३ करोड ५० लक्ष रुपयाची वर्धा नदीवर नवीन नळ योजना मंजूर केली. नवीन नळयोजनेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र वीज पुरवण्यासाठी प्रतीक्षा लागून आहे. त्यासाठी संबधीत विभागाने वीज कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वीज पुरवठा करण्यासाठी सांगितले. मात्र वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे वीज देयक थकीत असून त्याचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा करण्यात येणार नसल्याचे ग्रा.पं.ला सांगितले. परंतु ग्रा.पं.चा वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपये कर रुपात थकीत असून वीज कंपनीने थकिता देण्याची रक्कम कपात करावी व वीज पुरवठा करण्यास पत्र दिले.त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं. कमिटीने संयुक्त बैठक घेवून तडजोड करीत तीन लक्ष ३५ हजार भरण्याचे ठरले असता पुन्हा वीज मंडळाने ५ लक्ष ८६ हजार रुपये भरण्याचे पत्र दिले आहे. वीज मंडळाच्या अशा दुटप्पी व अडेलतट्टू धोरणाने गावकरी संतापले असून वीज कंपनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला असल्याचा सूर उमटत आहे.गावकºयांचा आंदोलनाचा इशारादहा वर्षांपासून कोठारीची जनता पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. नवीन नळयोजना पूर्णत्वास आली, मात्र वीज पुरवठा महावितरण कंपनी करीत नसल्याने गावकºयांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा करुन गावकºयांना पाणी पुरवठा न केल्यास कोठारीचे नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रा.पं. उपसरपंच अमोल कातकर यांनी दिला आहे.