शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चंद्रपूर जिल्ह्यातील कोटगाव ठरले मोटारपंपाचे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:45 IST

नागभीड तालुक्यातील कोटगावचे असेच झाले. येथील शिवारात जवळपास ३०० मोटारपंप असल्याने या गावाची मोटारपंपाचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही काही गावांचे एक वैशिष्ट्य असते. आणि या वैशिष्ट्यांमुळे त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होते. नागभीड तालुक्यातील कोटगावचे असेच झाले. येथील शिवारात जवळपास ३०० मोटारपंप असल्याने या गावाची मोटारपंपाचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आणि या मोटरपंपाच्या पाण्यावरच कोटगावने रोवणीमध्ये आघाडी घेतली आहे.कोटगाव हे नागभीडपासून सहा किमी अंतरावर आहे. १९५६ साली या गावाचा आदर्श गाव म्हणून शासनाकडून गौरव करण्यात आला होता. या गौरवाकरिता तत्कालीन मंत्री व माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांनी कोटगावला भेट दिली होती. एवढेच नाही तर २०१३ -१४ मध्ये या गावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते.अशी पार्श्वभूमी असलेल्या गावातील लोकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने येथील लोकांनी शेतीलाच सर्वस्व मानले आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाला येथील शेतकरी पार कंटाळून गेले होते. यावर मात कशी करायची, या विवंचनेत असताना त्यांना शेतात मोटारपंप हा पर्याय दिसून आला. आणि माजी आमदार बाबुराव भेंडारकर यांच्या शेतात पहिला मोटारपंप लावण्यात आला. यानंतर लगेचच २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतात मोटारपंप लावण्यात आले.

आता या गावात प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात मोटारपंप दिसत आहे. काही काही शेतकऱ्यांनी दोन तर काहींनी तीन मोटारपंप लावले आहेत. यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. अनेकांनी नाल्यावरही मोटारपंप लावले आहेत. मोटारपंपांच्या या व्यवस्थेने कोटगावची शेती समृद्ध झाली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण तालुक्यात एकाही गावात रोवणीची हालचाल नसली तरी कोटगावमध्ये धडाक्यात रोवणे सुरू करण्यात आले आहेत. कोटगावची आतापर्यंत २५ ते ३० टक्के रोवणी झाली आहे. यासाठी कोटगावकरांनी १५ ते २० दिवसांपूर्वीच पऱ्हे टाकले व पऱ्हे मोटरपंपाच्या पाण्यावर जगवले होते. त्यामुळेच हे शक्य झाले आहे.

टॅग्स :agricultureशेती