शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

महाराष्ट्र् तेलंगणा सीमेवरील कोष्टाळा-अंतरगाव डोंगरात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची ...

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपुरे मनुष्यबळ आणि आग नियंत्रण साहित्य व त्याची देखभाल, निधी अपुरा असल्याने वणवा नियंत्रण केवळ फार्स ठरत आहे.

दरवर्षी मार्च महिना सुरू होताच जंगलात आग लागते. विरुर वनपरिक्षेत्राचे बहुतांश वनक्षेत्र हे तेलंगणा सीमेवर असून दुर्गम पहाडीने वेढलेले आहे. शिवाय अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे, नियमित गस्त करणे अवघड असतानाच उन्हाळ्यात लागणारी आग नियंत्रणात आणणे वन कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. मागील चार दिवसांपासून या वन क्षेत्रात आग लागली आहे. ही आग तेलंगणा सीमेतून पसरत महाराष्ट्र जंगलात पसरली आहे. याबाबत तेलंगणात शिरपूर येथील वन अधिकारी यांना विरुर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तरीपण तेलंगणा वन अधिकारी यांचेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे समजते. तसेच सॅटेलाईटद्वारे आगीची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला सांगण्यात आले नाही, असे उत्तर दिले जाते. या अशा असहकार्यामुळे सीमेवरील पहाडी जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी विरुर वनक्षेत्राचे कोष्टाळा,अंतरगाव,देवाडा येथील वन कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मार्च महिना सुरू होताच वन क्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडत असतात. नैसर्गिक आगीस कारणीभूत वनस्पती,बांबू हे मोठ्या प्रमाणात मध्य चांदा वन विभागातील वनक्षेत्रात नसतानाही दरवर्षी आग लागली जात आहे. अजूनपर्यत आग कशी लागली,कुणी लावली हे स्पष्ट झाले नाही. असे असतानाही या आगीस मोहफुल गोळा करणारे मजूर,गुराखी तसेच तेंदूपाने चांगले यावे म्हणून तेंदू ठेकेदाराचे मजूर कारणीभूत असल्याचा संशय वन अधिकारी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी जंगलात आग लागू नये किंवा ती आग इतरत्र पसरू नये म्हणून विशेष निधी अंतर्गत हंगामी अग्निरक्षक वनमजूर तयार केले जातात. तसेच प्रत्येक नियत वनक्षेत्रात अग्नी जाळ रेषा काढून ती जाळली जाते. परंतु हा प्रयत्न सुद्धा मानवी हस्तक्षेपात अपूर्ण पडत आहे.