शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

महाराष्ट्र् तेलंगणा सीमेवरील कोष्टाळा-अंतरगाव डोंगरात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची ...

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपुरे मनुष्यबळ आणि आग नियंत्रण साहित्य व त्याची देखभाल, निधी अपुरा असल्याने वणवा नियंत्रण केवळ फार्स ठरत आहे.

दरवर्षी मार्च महिना सुरू होताच जंगलात आग लागते. विरुर वनपरिक्षेत्राचे बहुतांश वनक्षेत्र हे तेलंगणा सीमेवर असून दुर्गम पहाडीने वेढलेले आहे. शिवाय अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे, नियमित गस्त करणे अवघड असतानाच उन्हाळ्यात लागणारी आग नियंत्रणात आणणे वन कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. मागील चार दिवसांपासून या वन क्षेत्रात आग लागली आहे. ही आग तेलंगणा सीमेतून पसरत महाराष्ट्र जंगलात पसरली आहे. याबाबत तेलंगणात शिरपूर येथील वन अधिकारी यांना विरुर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तरीपण तेलंगणा वन अधिकारी यांचेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे समजते. तसेच सॅटेलाईटद्वारे आगीची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला सांगण्यात आले नाही, असे उत्तर दिले जाते. या अशा असहकार्यामुळे सीमेवरील पहाडी जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी विरुर वनक्षेत्राचे कोष्टाळा,अंतरगाव,देवाडा येथील वन कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मार्च महिना सुरू होताच वन क्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडत असतात. नैसर्गिक आगीस कारणीभूत वनस्पती,बांबू हे मोठ्या प्रमाणात मध्य चांदा वन विभागातील वनक्षेत्रात नसतानाही दरवर्षी आग लागली जात आहे. अजूनपर्यत आग कशी लागली,कुणी लावली हे स्पष्ट झाले नाही. असे असतानाही या आगीस मोहफुल गोळा करणारे मजूर,गुराखी तसेच तेंदूपाने चांगले यावे म्हणून तेंदू ठेकेदाराचे मजूर कारणीभूत असल्याचा संशय वन अधिकारी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी जंगलात आग लागू नये किंवा ती आग इतरत्र पसरू नये म्हणून विशेष निधी अंतर्गत हंगामी अग्निरक्षक वनमजूर तयार केले जातात. तसेच प्रत्येक नियत वनक्षेत्रात अग्नी जाळ रेषा काढून ती जाळली जाते. परंतु हा प्रयत्न सुद्धा मानवी हस्तक्षेपात अपूर्ण पडत आहे.