शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

महाराष्ट्र् तेलंगणा सीमेवरील कोष्टाळा-अंतरगाव डोंगरात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची ...

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपुरे मनुष्यबळ आणि आग नियंत्रण साहित्य व त्याची देखभाल, निधी अपुरा असल्याने वणवा नियंत्रण केवळ फार्स ठरत आहे.

दरवर्षी मार्च महिना सुरू होताच जंगलात आग लागते. विरुर वनपरिक्षेत्राचे बहुतांश वनक्षेत्र हे तेलंगणा सीमेवर असून दुर्गम पहाडीने वेढलेले आहे. शिवाय अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे, नियमित गस्त करणे अवघड असतानाच उन्हाळ्यात लागणारी आग नियंत्रणात आणणे वन कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. मागील चार दिवसांपासून या वन क्षेत्रात आग लागली आहे. ही आग तेलंगणा सीमेतून पसरत महाराष्ट्र जंगलात पसरली आहे. याबाबत तेलंगणात शिरपूर येथील वन अधिकारी यांना विरुर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तरीपण तेलंगणा वन अधिकारी यांचेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे समजते. तसेच सॅटेलाईटद्वारे आगीची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला सांगण्यात आले नाही, असे उत्तर दिले जाते. या अशा असहकार्यामुळे सीमेवरील पहाडी जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी विरुर वनक्षेत्राचे कोष्टाळा,अंतरगाव,देवाडा येथील वन कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मार्च महिना सुरू होताच वन क्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडत असतात. नैसर्गिक आगीस कारणीभूत वनस्पती,बांबू हे मोठ्या प्रमाणात मध्य चांदा वन विभागातील वनक्षेत्रात नसतानाही दरवर्षी आग लागली जात आहे. अजूनपर्यत आग कशी लागली,कुणी लावली हे स्पष्ट झाले नाही. असे असतानाही या आगीस मोहफुल गोळा करणारे मजूर,गुराखी तसेच तेंदूपाने चांगले यावे म्हणून तेंदू ठेकेदाराचे मजूर कारणीभूत असल्याचा संशय वन अधिकारी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी जंगलात आग लागू नये किंवा ती आग इतरत्र पसरू नये म्हणून विशेष निधी अंतर्गत हंगामी अग्निरक्षक वनमजूर तयार केले जातात. तसेच प्रत्येक नियत वनक्षेत्रात अग्नी जाळ रेषा काढून ती जाळली जाते. परंतु हा प्रयत्न सुद्धा मानवी हस्तक्षेपात अपूर्ण पडत आहे.