शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यात साथीचे थैमान

By admin | Updated: September 29, 2014 23:03 IST

सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक

लखमापूर : सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शासकीय आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या वातावरणात उष्णतेची लाट आहे. परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस कोसळतो. थोड्याच वेळात लख्ख सूर्यप्रकाश पडून उष्णतेत वाढ होते. ऊन्ह-पावसाचा खेळ सुरू असताना वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विस्कळीत झालेल्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे तालुक्यात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. अस्वच्छ वातावरण व दूषित पाण्यामुळे तापाच्या साथीत भर पडत आहे.सर्दी, खोकला, अंग दुखणे यासह रुग्णांना प्रथम ताप येतो. औषधे घेऊनही हा ताप कमी होत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधोपचार करूनही ताप कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच तालुक्यातील आवाळपूर येथील दीपक बापुराव उराडे याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच आंबेडकर वॉर्डातील सात ते आठ रुग्ण चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची भीती पुन्हा वाढली आहे. त्याच्या दीपकच्या मृत्यूपूर्वी त्याला तीन-चार दिवस ताप आल्याची माहिती आहे. तापाने तालुक्यात थैमान घातले असताना शासकीय आरोग्य यंत्रणा कुंंभकर्णी झोपेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावात जाऊन रुग्णांमध्ये कसल्याही प्रकारची जागृती करताना दिसत नाही. परिचारिका गावात जात नाही. खेड्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर नियमित टाकले जात नाही. स्वच्छतेबद्दल ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. त्यातच सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कर्मचारी बिधनास्त वावरत आहेत.सध्या तापाचा जोर एवढा आहे की रुग्ण आजारी पडला, की तो एका दिवसातच मृत्युमुखी पडतो. आवाळपूर येथील दीपक बाबुराव उराडेसह येथील अनेक रुग्ण आजारी पडल्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालजात भरती करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाने एक दिवस उपचार केल्यावर या सर्वांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविले. मात्र त्यांपैकी दीपकचा मृत्यू झाला. पावसाळा संपत आला तरी जंतू नाशक पावडरची फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात डासांचा प्रकोप आहे. त्यातून साथीचे आजार उद्भवत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातकील ग्रामीण भागात जंतू नाशक पावडरची फरवारणी करण्याची मागणी केली जात आहे. पूर्वी पावसाळ्यात अशा प्रकारच्या फवारण्या जिल्हा परिषदेमार्फत होत होत्या. मात्र गेल्या काही वर्षात या फवारण्या बंद झाल्या आहे. त्यामुळे अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवत आहेत. (वार्ताहर)