शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरची दंगल सरकार पुरस्कृत; उत्तरप्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 19:24 IST

Chandrapur News कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर : कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर एक व्हीडीओ सार्वत्रिक करून कोल्हापूर दंगल सरकारचे देण असल्याचे म्हटले आहे. तर विदर्भातील तरूणीची मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतीगृहात झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. उत्तर प्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशीही टीका वडेट्टीवार यांनी केली.

कोल्हापूरचा राडा नियोजित आहे. या राड्याच्या संदर्भात सरकारकडे बोट निश्चित पणे जाईल हे खात्रीपूर्वक आम्ही सांगू शकतो. राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये या सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्यानंतर व निवडणूकीबाबतचे सर्व सर्वेक्षण विरोधात गेल्यानंतर सरकारने आता राज्यात जातीय तेढ निर्माण करणे, जातीय तणाव निर्माण करणे, दंगली, राडे तयार करून हिंदू मुस्लीम मध्ये तेढ निर्माण करून स्वत:च्या सत्तेची पोळी भाजण्याचे काम यांनी सुरू केले आहे. याचाच परिपाक कोल्हापूरची घटना आहे असे ते म्हणाले. 

 या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, या सरकारने विश्वास गमावला आहे. सरकारने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. जसजशा निवडणूका जवळ येईल तस तशा जातीय दंगली, धार्मिक व्देश वाढविण्याचे काम केले आहे. हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याशिवाय या सरकारसमोर दुसरा मार्ग नाही, मतांचे विभाजन करून निवडून येण्याशिवाय दुसरा पर्यांय या सरकार समोर नाही, सर्व आघाड्यांवर सरकार फेल झाले आहे. सरकार कुठलेही काम करित नाही. अशा परिस्थितीत सरकारने दंगली करा, तेढ निर्माण करा, जातीय तणाव तयार करा आणि मते घ्या व सत्तेत असेच पाऊल सरकारने टाकले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता या सरकारला माफ करणार नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

तसेच मुंबई वसतीगृहात झालेली घटना ही दुर्देवी आहे. उत्तर प्रदेश नंतर महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महिलांची सुरक्षा करण्यात या सरकारला अपयश आले आहे. सरकार स्वत:च्या सुरक्षेसाठी लढत आहे, त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षा पुरवूच शकत नाही. विदर्भाची ही कन्या आहे, शिक्षणासाठी गेलेल्या मुलीला या पध्दतीने अत्याचार होत असेल तर व जीव गमवावा लागत असेल तर कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेला नाही, सरकारचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीवर राहिला नाही, स्वत:च्या आमदार, खासदार व मंत्र्यांवर या सरकारचा धाक राहिला नाही. तेव्हा गुन्हेगारांवर कसा धाक राहिल असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

नालायक सरकार राज्यातून घालविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तरूणीचा विषय विधीमंडळात लावू, याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर लढत राहू, झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे, सरकारला थोडी तरी या प्रकरणी चिंता करायची गरज आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार