शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरची दंगल सरकार पुरस्कृत; उत्तरप्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 19:24 IST

Chandrapur News कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर : कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर एक व्हीडीओ सार्वत्रिक करून कोल्हापूर दंगल सरकारचे देण असल्याचे म्हटले आहे. तर विदर्भातील तरूणीची मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतीगृहात झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. उत्तर प्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशीही टीका वडेट्टीवार यांनी केली.

कोल्हापूरचा राडा नियोजित आहे. या राड्याच्या संदर्भात सरकारकडे बोट निश्चित पणे जाईल हे खात्रीपूर्वक आम्ही सांगू शकतो. राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये या सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्यानंतर व निवडणूकीबाबतचे सर्व सर्वेक्षण विरोधात गेल्यानंतर सरकारने आता राज्यात जातीय तेढ निर्माण करणे, जातीय तणाव निर्माण करणे, दंगली, राडे तयार करून हिंदू मुस्लीम मध्ये तेढ निर्माण करून स्वत:च्या सत्तेची पोळी भाजण्याचे काम यांनी सुरू केले आहे. याचाच परिपाक कोल्हापूरची घटना आहे असे ते म्हणाले. 

 या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, या सरकारने विश्वास गमावला आहे. सरकारने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. जसजशा निवडणूका जवळ येईल तस तशा जातीय दंगली, धार्मिक व्देश वाढविण्याचे काम केले आहे. हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याशिवाय या सरकारसमोर दुसरा मार्ग नाही, मतांचे विभाजन करून निवडून येण्याशिवाय दुसरा पर्यांय या सरकार समोर नाही, सर्व आघाड्यांवर सरकार फेल झाले आहे. सरकार कुठलेही काम करित नाही. अशा परिस्थितीत सरकारने दंगली करा, तेढ निर्माण करा, जातीय तणाव तयार करा आणि मते घ्या व सत्तेत असेच पाऊल सरकारने टाकले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता या सरकारला माफ करणार नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

तसेच मुंबई वसतीगृहात झालेली घटना ही दुर्देवी आहे. उत्तर प्रदेश नंतर महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महिलांची सुरक्षा करण्यात या सरकारला अपयश आले आहे. सरकार स्वत:च्या सुरक्षेसाठी लढत आहे, त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षा पुरवूच शकत नाही. विदर्भाची ही कन्या आहे, शिक्षणासाठी गेलेल्या मुलीला या पध्दतीने अत्याचार होत असेल तर व जीव गमवावा लागत असेल तर कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेला नाही, सरकारचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीवर राहिला नाही, स्वत:च्या आमदार, खासदार व मंत्र्यांवर या सरकारचा धाक राहिला नाही. तेव्हा गुन्हेगारांवर कसा धाक राहिल असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

नालायक सरकार राज्यातून घालविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तरूणीचा विषय विधीमंडळात लावू, याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर लढत राहू, झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे, सरकारला थोडी तरी या प्रकरणी चिंता करायची गरज आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार