शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:44 IST

राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली.राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. तेव्हापासून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी गळफास लावून केल्या. या आत्महत्या वाढतच आहेत. पण, शासनाने चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली नाही. सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे राज्यव्यापर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, किसानपुत्र फाउंडेशन, भूमीपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, जनसेवा विकास सेना, युथ चांदा ब्रिगेड, इको प्रो, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी कुणबी संघटना, धर्मराज्य पक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ आॅफ चांदा व चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.