शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोयाबीनचे उत्पादन क्विंटलऐवजी किलोत

By admin | Updated: November 10, 2014 22:41 IST

टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे

टेमुर्डा : टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही अनेक शेतकऱ्यांच्या हाती आलेच नाही. ज्यांच्या हाती आले ते क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचावा म्हणून उभे पिकच वखरुन टाकले आहे. वरोरा तालुक्यातील २१ हजारावर हेक्टरमध्ये सोयाबिनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतांमध्ये सोयाबीनचे उत्पादन झाले, तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पूर्णपणे नष्ट झाले. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला, तर दुसरीकडे रब्बी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजुंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातूनच पिजदुरा येथील संतोष नारायण नक्षिणे (५२) या शेतकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. सोयाबीनकडे रोखीचे पीक म्हणून पाहिल्या जाते. आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने यंदा कापसाचा हमी भाव जाहीर करताना क्विंटलमागे केवळ ५० रुपयांची वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रुपये आहे. बागायती कपाशीला एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. मात्र हाती येणारे उत्पन्न व त्याला मिळणारा बाजारभाव यामुळे हा खर्च निघण्याचीही आशा आता मावळली आहे. (वार्ताहर)