शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख ६० हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

By admin | Updated: April 22, 2016 02:50 IST

कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. या खरीप

चंद्रपूर : कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. या खरीप हंगामाचे नियोजन गांभीर्यपूर्वक करून शेतकऱ्यांना बियाणे व खतासाठी कोणत्याही अडचणी जाणार नाही, याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, काळा बाजार रोखावा व सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी कृषी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे गुरूवारी खरीप हंगामाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ.शोभाताई फडणवीस, आ. नाना श्यामकुळे, आ. सुरेश धानोरकर, आ. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व जि. प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर उपस्थित होते.या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी संबंधी विविध योजना व खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. योजना राबवित असताना किंवा कामाचे नियोजन करीत असताना काही अडचण आल्यास ते लेखी स्वरुपात कळविण्याच्या सूचना पालकमंत्र्यानी यावेळी दिल्या. यावर्षी पाऊस चांगला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून हा खरीप सुगीचा जाईल, असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले. शेतकरी स्वाभिमान वर्ष राबवित असताना शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशा प्रकारे खरीपाचे नियोजन असावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत कृषी विषयी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे संचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे यांनी केले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मागेल त्याला विहिर द्या४पेरणीचे नियोजन, बँकनिहाय कर्ज वाटप, कर्ज पुर्नगठन, राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, प्रलंबित कृषी पंपाच्या जोडण्या, बियाणांची उपलब्धता, खते किटकनाशके आदी विषयाचा या बैठकीत पालकमंत्र्यानी आढावा घेतला. मागेल त्याला विहीर या अंतर्गत जिल्ह्यात ५ हजार विहिरीचा लक्षांक ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. २ हजार ६११ मेट्रीक टन खत उपलब्ध४जिल्ह्यास विविध पिकांकरिता एकूण ८६ हजार ३८२ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. खरीप हंगामाकरिता १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आंवटन असून २६११ मेट्रीक टन खत प्राप्त झाले आहे. यातून २०० मेट्रीक टन खताची विक्री झालेली आहे. तर २४११ मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. असे आहे खरीपपेरणीचे नियोजन४सन २०१६-१७ मध्ये खरीप हंगामाकरिता ४ लाख ६० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात १ लाख ७२ हजार, सोयाबिन ८० हजार हेक्टर असे नियोजन आहे.