शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

तालुक्यातील तीनही राज्यमहामार्गावर खड्डेच

By admin | Updated: January 1, 2015 23:00 IST

कोरपना तालुक्यातून तीन राज्यमहामार्ग जातात. मात्र हे तीनही मार्ग दुर्लक्षित अवस्थेत असल्याने नागरिकांना या मार्गाचा प्रवास जिवघेणा ठरत आहे. यामध्ये राजुरा-कोरपना- आदिलाबाद,

रत्नाकर चटप - नांदाफाटाकोरपना तालुक्यातून तीन राज्यमहामार्ग जातात. मात्र हे तीनही मार्ग दुर्लक्षित अवस्थेत असल्याने नागरिकांना या मार्गाचा प्रवास जिवघेणा ठरत आहे. यामध्ये राजुरा-कोरपना- आदिलाबाद, गडचांदूर-भोयगाव-महाकुर्ला, देवाडा-वनोजा-राळेगाव या तीन राज्यमहामार्गाचा समावेश आहे. १५ वर्षापूर्वी भोयगाव पुल बांधण्यात आल्याने पुढे यवतमाळ, नागपूर जिल्ह्याला जोडणारा राज्यमहामार्ग तयार झाला. त्यानंतर तालुक्यातील वनोजा पुलाच्या बांधकामामुळे राळेगाव-वर्धा-नागपूर असा मार्ग तयार झाला तर आंध्रप्रदेशात जाण्यासाठी चंद्रपूर - बल्लारपूरवरून पुढे राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद (तेलंगाना) आणि पुढे मराठवाड्यात नांदेडकडे जाणारा मार्ग कोरपना तालुक्यातून जातो. सदर तालुका औद्योगिक तालुका असल्याने वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र रस्त्याची अवस्था गंभीर आहे. यातील तिनही रस्ते कुठे अर्धवट बांधकाम तर डांबरीकरणाविनाच दिसत आहे. गडचांदूर-भोयगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असुन काही महिन्यांपूर्वी डांबरीकरणही करण्यात आले होते. मात्र पुरामुळे व वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने भोयगाव ते धानोरा या गावापर्यंत प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नांदाफाटा वनोजा फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था दयनिय आहे. राजुरा - आदिलाबाद मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असुन गडचांदूर ते धामणगाव फाटा, सोनुर्ली ते वनसडी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. भोयगाव रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. यापुर्वी आंदोलन करून गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर या मार्गाच्या कामासाठी मंजुरी मिळाली असल्याचे लोकप्रतिनिधींकडूनही सांगण्यात आले. मात्र अजूनही भोजगाव रस्त्याचा भोग कायम आहे. या रस्त्याच्या दैनावस्थेमुळे काही दिवस विद्यार्थ्यांची एस.टी. बस बंद होती तर भाजीपाला विकणारे, दुध विक्रेते, शेतकरी आणि कामगार कमालीचे हैराण आहे. कोरपना तालुक्यातील नागरिकांना चंद्रपूर - नागपूर प्रवास करायचा असल्यास बल्लारशहा मार्गापेक्षा भोयगाव मार्ग आर्थिकदृष्ट्या कमी अंतरामुळे अधिक सोयीस्कर आहे. त्यामुळे नरकयातना सहन करीत नाईलाजास्तव नागरिक प्रवास करीत आहे. यातच अनेक शासकिय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी दुचाकी व सायकलने या मार्गावरून प्रवास करतात. सिमेंट कंपन्यांचे ओव्हरलोड जडवाहने सततचालुच असतात. जिवघेण्या खड्डयांमुळे आता रस्त्यावर धुळ उडताना दिसत असुन रस्ता दिवसेंदिवस उखडत चाललेला आहे. (अंतिम)