शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

बेरोजगारांची कामासाठी केविलवाणी धडपड

By admin | Updated: April 25, 2015 01:31 IST

ताडाळी एमआयडीसी येथील आस्थापनांमध्ये आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील बरेचसे तरूण आस्थापनांमध्ये आपला ‘बायोडाटा’ देत असतात.

वतन लोणे घोडपेठताडाळी एमआयडीसी येथील आस्थापनांमध्ये आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील बरेचसे तरूण आस्थापनांमध्ये आपला ‘बायोडाटा’ देत असतात. मात्र परिसरातील उद्योगांच्या बिकट अवस्थेमुळे फक्त मोजक्याच तरूणांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. मात्र बऱ्याच उच्चशिक्षित तरूणांना नोकरी न मिळाल्यामुळे त्यांची निराशा होत आहे.तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरूणांची संख्या जिल्ह्यात लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी तांत्रिक पदवी घेवून पास होणाऱ्या तरूणांची संख्या या संख्येमध्ये भरच घालत असते. महिन्याकाठी ताडाळी एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी बायोडाटा देणाऱ्या तरूणांची संख्या पाचशेच्या आसपास आहे. मात्र इंजीनियरिंगमध्ये पदविका असूनही तरूणांना एक नोकरी मिळविण्यासाठी देखील केविलवाणी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.पालक मुलांना लाखो रूपये खर्च करून अभियांत्रिकीच्या पदविकेचे शिक्षण देतात. मुलगा चांगल्या पगारावर नोकरीला लागावा ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या इच्छांना मारून प्रसंगी पैसे कर्जाने काढून पालक मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देतात. मात्र मुलांचे शिक्षण पुर्ण झाल्यावर मुलांना नोकरी मिळविणे खुप कठीण झाले आहे.मनासारखी नोकरी मिळाल्यावर आपले राहणीमान उंचावेल असे बऱ्याचशा अभियांत्रिकी किंवा तत्सम शिक्षण घेतलेल्या तरूणांचे स्वप्न असते. तसेच नोकरी मिळाल्यानंतर लग्न करून जीवन मजेत घालवायचे, असे प्रत्येक तरूणांचे स्वप्न असते. मात्र जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील तरूणांची निराशा होत आहे. त्यातच नोकरी नसलेल्या तरूणांना लग्नासाठी मुलीच कुणी देत नसल्यामुळे तरूणांचे सुखी संसाराचे स्वप्नही भंग होण्याच्या मार्गावर आहे.उद्योगांचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जात असले तरी या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगारासाठी हेळसांडच होत आहे. परप्रांतीय युवकांना संधी दिली जाते. तर स्थानिकांना डावलले जाते, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योग प्रशासनाप्रती युवकांमध्ये असंतोष पसरला आहे. तक्रार करूनही फायदा होत नसल्याने हताश झालेले युवक विविध मार्गाकडे वळत असून काहींनी उच्च शिक्षण घेऊनही पानटपरी व्यवसाय करीत आहेत. महाराष्ट्रात प्रदुषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच देशात प्रदूषणाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी २०१० पासून नव्या उद्योगांना बंदी घालण्यात आली आहे. याचे फलित म्हणून जिल्ह्यातल्या प्रदूषणात घट झाली असून आता चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत देशात सहाव्या क्रमांकावर आला आहे. हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र बेरोजगारीच्या प्रश्नावरही शासनाने लवकरात लवकर उपाय शोधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या दोन तीन वर्षात शासनाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाही.