शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

केरोसीनचा पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना सुरू केल्या. मात्र, यातील अनेक योजना बंद करण्यात ...

चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना सुरू केल्या. मात्र, यातील अनेक योजना बंद करण्यात आल्या आहे. त्यातच उज्ज्वला योजनेमुळे शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडणीत वाढ झाली आहे.

देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरून महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करून घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला; पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने शेवटी गरीब जनता सरपण गोळा करून स्वयंपाक शिजवत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरपण पेटविण्यासाठी केरोसीनची आवश्यकता आहे. केरोसीन मिळविण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पूर्वी शेतकरी शेतात जागल करण्यासाठी केरोसीनचा दिवा, कंदिलाचा वापर करीत होते. मात्र, केरोसीन बंदीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या थोडी हवा जरी आली तरी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे खेड्यातील जनतेला वीज येईपर्यंत अंधाराचा सामना करावा लागत आहे. केरोसीन बंदीमुळे दिवा, कंदिलाचा उपयोग होताना दिसत नाही. सामान्य कुटुंबातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे.