शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

काळे गुरूजींच्या निधनाने चिमूर जिल्हा चळवळ पोरकी

By admin | Updated: May 24, 2017 02:06 IST

चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी

उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला राजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उमा नदीच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा अ‍ॅड. महेशदत्त काळे यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या निधनामुळे चिमूर क्रांतीचा एक साक्षीदार हरपला असून चिमूर जिल्ह्याची चळवळ पोरकी झाली आहे. सावली तालुक्यात विहिरगाव (बोरमाळा) येथे १२ आॅक्टोबर १९२३ त्यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी राजवटीतही शिक्षणाचे धडे गिरवले. १९३६ मध्ये चंद्रपूर येथील ज्युबली हायस्कूल येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रायपूर येथे राजकुमार महाविद्यालयात ‘हाऊ टु रुल’ हे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांचा संबंध भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्याशी आला. दोघांनीही अनेक वर्षे सोबत कार्य केले. १९४२ ला चिमूर येथे बहिणीकडे नागपंचमीला आले होते. त्यावेळी चिमुरात इंग्रजांविरूध्द उठावच्या हालचाली सुरू होत्या. काळे गुरूजी तरूण असल्याने त्यांनीही १६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांती लढयात उडी घेतली. या लढ्यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. या स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याने चिमूर शहराने १९४२ लाच तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले. या लढ्याचे काळे गुरूजी प्रत्यक्ष साक्षदार होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काळे गुरूजींनी चिमूरलाच आपली कर्मभूमी मानली. स्वातंत्र लढ्यातील सहभाग व तल्लक, प्रखर मतवादी विचारामुळे ते चिमुरकरांसाठी एक आदर्श बनले. इंग्रज राजवटीत चिमूर परगणा जिल्हा असल्याचे गुरूजी सांगत. त्यामुळेच त्यांनी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची चळवळ उभी केली. चिमूर जिल्ह्यासाठी अनेक आंदोलने केली. मोर्चे काढले. निवेदन देवून शासनाचे या मगणीकडे लक्ष वेधले. शासनाने प्रत्येकवेळी आश्वासन दिले. अजूनही चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी अपूर्णच राहिली. त्यांच्या जाण्याने ही चववळ आता पोरकी झाली आहे. काळे गुरूजीच्या मृत्युने चिमूरकरांसह तालुक्याची मोठी हानी झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच झालेल्या १९६२ च्या विधानसभा निवडणुकीला ते सावली मतदार संघातून सामोरे गेले. कार्यकर्त्यांच्या बळावर सायकल व पायी प्रचार यंत्रणा राबवून प्रतिस्पर्धी उमेदवार मा.सा. कन्नमवार यांना जेरीस आणले होते. त्या निवडणुकीत ९३० मतांनी कन्नमवार विजयी झाले.काळे गुरूजी यांचा राजकारण हा आवडता विषय. समाजातील नागरिकांच्या समस्या व चिमूर क्रांती जिल्ह्यांची मागणी या विषयावर काळे गुरूजी सभा घेत. सभेत येणाऱ्यांना विनातिकीट प्रवेश वर्ज्य होता. या सभेतून जमा झालेली रक्कम चिमूर क्रांती जिल्ह्याचा आंदोलनासाठी उपयोगात आणायचे. एक रुपया तिकीट असतानाही काळे गुरुजींच्या भाषणाला अफाट गर्दी व्हायची. ‘चिमूरचा आवाज’ साप्ताहिकातून चिमूर क्रांती जिल्ह्याचा आवाज बुलंद केला. ‘गरम सलाख’ हे स्लोगन प्रसिद्ध झाले होते. काळे गुरुजींनी चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीला शासन दरबारी पोहचविण्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढल्या. १९९७ मध्ये जि.प.वर प्रचंड मतांनी निवडून देत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.