शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

काळे गुरूजींच्या निधनाने चिमूर जिल्हा चळवळ पोरकी

By admin | Updated: May 24, 2017 02:06 IST

चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी

उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला राजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उमा नदीच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा अ‍ॅड. महेशदत्त काळे यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या निधनामुळे चिमूर क्रांतीचा एक साक्षीदार हरपला असून चिमूर जिल्ह्याची चळवळ पोरकी झाली आहे. सावली तालुक्यात विहिरगाव (बोरमाळा) येथे १२ आॅक्टोबर १९२३ त्यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी राजवटीतही शिक्षणाचे धडे गिरवले. १९३६ मध्ये चंद्रपूर येथील ज्युबली हायस्कूल येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रायपूर येथे राजकुमार महाविद्यालयात ‘हाऊ टु रुल’ हे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांचा संबंध भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्याशी आला. दोघांनीही अनेक वर्षे सोबत कार्य केले. १९४२ ला चिमूर येथे बहिणीकडे नागपंचमीला आले होते. त्यावेळी चिमुरात इंग्रजांविरूध्द उठावच्या हालचाली सुरू होत्या. काळे गुरूजी तरूण असल्याने त्यांनीही १६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांती लढयात उडी घेतली. या लढ्यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. या स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याने चिमूर शहराने १९४२ लाच तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले. या लढ्याचे काळे गुरूजी प्रत्यक्ष साक्षदार होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काळे गुरूजींनी चिमूरलाच आपली कर्मभूमी मानली. स्वातंत्र लढ्यातील सहभाग व तल्लक, प्रखर मतवादी विचारामुळे ते चिमुरकरांसाठी एक आदर्श बनले. इंग्रज राजवटीत चिमूर परगणा जिल्हा असल्याचे गुरूजी सांगत. त्यामुळेच त्यांनी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची चळवळ उभी केली. चिमूर जिल्ह्यासाठी अनेक आंदोलने केली. मोर्चे काढले. निवेदन देवून शासनाचे या मगणीकडे लक्ष वेधले. शासनाने प्रत्येकवेळी आश्वासन दिले. अजूनही चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी अपूर्णच राहिली. त्यांच्या जाण्याने ही चववळ आता पोरकी झाली आहे. काळे गुरूजीच्या मृत्युने चिमूरकरांसह तालुक्याची मोठी हानी झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच झालेल्या १९६२ च्या विधानसभा निवडणुकीला ते सावली मतदार संघातून सामोरे गेले. कार्यकर्त्यांच्या बळावर सायकल व पायी प्रचार यंत्रणा राबवून प्रतिस्पर्धी उमेदवार मा.सा. कन्नमवार यांना जेरीस आणले होते. त्या निवडणुकीत ९३० मतांनी कन्नमवार विजयी झाले.काळे गुरूजी यांचा राजकारण हा आवडता विषय. समाजातील नागरिकांच्या समस्या व चिमूर क्रांती जिल्ह्यांची मागणी या विषयावर काळे गुरूजी सभा घेत. सभेत येणाऱ्यांना विनातिकीट प्रवेश वर्ज्य होता. या सभेतून जमा झालेली रक्कम चिमूर क्रांती जिल्ह्याचा आंदोलनासाठी उपयोगात आणायचे. एक रुपया तिकीट असतानाही काळे गुरुजींच्या भाषणाला अफाट गर्दी व्हायची. ‘चिमूरचा आवाज’ साप्ताहिकातून चिमूर क्रांती जिल्ह्याचा आवाज बुलंद केला. ‘गरम सलाख’ हे स्लोगन प्रसिद्ध झाले होते. काळे गुरुजींनी चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीला शासन दरबारी पोहचविण्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढल्या. १९९७ मध्ये जि.प.वर प्रचंड मतांनी निवडून देत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.