शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून पिकांची राखण

By admin | Updated: October 12, 2015 01:28 IST

उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतीवर अतोनात खर्च केला. उसनवारीने कर्ज घेऊन शेती पिकविली.

उपाययोजना हवी : अतोनात खर्चानंतरही वन्यप्राणी करीत आहे पिकांना उद्ध्वस्तप्रकाश काळे गोवरीउद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतीवर अतोनात खर्च केला. उसनवारीने कर्ज घेऊन शेती पिकविली. आता शेतीपिके फळावर आली असताना कपाशी, सोयाबिन, मिरची, तूर पिकात वन्यप्राण्यांचा भरदिवसा शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धुमाकूळ सुरु आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही मोठ्या मेहनतीने पिक उभे केले. मात्र वन्यप्राण्यांचे कळप शेतात हाती आलेले पिक उद्ध्वस्त करीत आहे. यावर पायाबंद घालण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून बळीराजा शेतपिकांची राखण करीत आहे. राजुरा तालुक्यातील कोळसा खाण परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले. या ढिगाऱ्यावर काटेरी वनस्पतींनी अतिक्रमण केल्याने झुडपी जंगल निर्माण झाले. ३० वर्षापूर्वी असे जंगल अस्तित्वात नसल्याने वन्यप्राण्यांचा त्यावेळी शेतात धुमाकूळ नसायचा. जंगलातील प्राणी जंगलातच राहायचे. मात्र माणसाने जंगले पूर्णत: नष्ट केल्याने वन्यप्राण्यांनी शेताकडे धाव घेतली.त्याचा विपरित परिणाम आता शेतीवर होऊ लागला आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी परिसरात वन्यप्राण्यांचा पूर्वी त्रास नसायचा. एखादा वन्यप्राणी शेतात चुकून आलाच तर शेतकरी त्याला हुसकावून लावायचे. मात्र वन्यप्राण्याचा कळपच आता दिवस-रात्र फळावर आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहे. शेतात लावलेल्या कुंपणालाही प्राणी जुमानत नसल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शेतात कापूस फुटून आहे. तर सोयाबिन कापणी सुरु आहे. जंगलात वन्यप्राण्यांना खायला काहीच मिळत नसल्याने उभ्या पिकांत धुमाकूळ घातला आहे. मात्र यावर पायाबंद घालणारी कोणतीच यंत्रणा शेतकऱ्यांजवळ नाही. त्यामुळे डौलदार पिकांची एका रात्रीतून वाट लावली जात आहे. पिकांवर केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. वन्यप्राण्यांचे कळप माणसाला भीत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पिकांची जोपासना केली तरच मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करता येईल, अशी आस शेतकऱ्यांना आहे. कुटुंबाचा भार पेलताना शेतकऱ्यांची होणारी कसरत काळजाचा ठोका चुकविणारी आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी अन्नधान्य पिकवतो. मात्र त्याने पिकविलेली चतकोर भाकरही त्याला खाता येत नाही.संपूर्ण यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने शेतकरी पूर्णत: हादरुन गेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.एकूण सर्वच परिस्थितीच शेतकऱ्यांसाठी मारक असल्याने हाडाची काडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुठपर्यंत हाल सहन करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतीचा व्यवसायच पार ढासळत चालल्याने आर्थिक चणचणीत सापडलेला शेतकरी परिस्थितीचा गुलाम होऊन जगतो आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होत असलेली ससेहोलपट अनेकांना अस्वस्थ करणारी आहे. मात्र आजवर शासकीय यंत्रणेने यावर कोणताच रामबाण उपाय शोधला नाही. शेतकऱ्यांच्या जीवनाशी चाललेला हा खेळ कधी संपणार आणि कधी शेतकरीदादा सुखाचा अनुभव घेणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.