शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कवडसीची शाळाच वेगळी !

By admin | Updated: December 6, 2014 01:18 IST

जिल्हा परिषदतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळा खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत मागे पडत असल्याची ओरड आहे.

साईनाथ कुचनकार चंद्रपूरजिल्हा परिषदतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळा खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत मागे पडत असल्याची ओरड आहे. ही ओरड काही प्रमाणात योग्य असली तरी, आजही काही जिल्हा परिषद शाळांनी आपला दर्जा कायम ठेवला आहे. एवढेच नाही तर, खासगी शाळांना लाजवेल अशा शाळा जिल्ह्यात आहे. केवळ इमारत आणि परिसर स्वच्छताच नाही तर, विद्यार्र्थ्यांची गुणवत्ता आणि आवश्यक असलेले जीवनमुल्येही शिकविल्या जात आहे. आता तर विद्यार्थ्यांनी चक्क गावातील स्वच्छतेचे सर्व्हेक्षणही सुरु केले आहे. पालकांच्या सहभागातून उभ्या असलेल्या या शाळेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशीच चिमूर तालुक्यातील कवडसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वांचे लक्ष वेधत आहे.जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा ग्रामीण भागात आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घेऊन सध्या ओरड सुरु आहे. यामुळे शासन, प्रशासनही चिंतेत सापडले आहे. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थी टिकविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यासाठी अधिकारीही त्याच तत्परतेने कामाला लागले आहे. यात काही प्रमाणात बदल होत आहे. मात्र काही गावांमध्ये ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळा दिमाखात उभ्या आहे. कवडसी येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळा इमारत, रंगरंगोटी केली आहे. एवढेच नाही तर ई-लर्निंगसाठी ग्रामस्थांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपये गोळा करुन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचा पाया अंगणवाडीतून मजबुत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेसोबतच अंगणवाडीच्या विकासातही हातभार लावला आहे. अंगणवाडीत सर्व भौतिक सुविधा, पाण्याची व्यवस्था, शौचालय, मुत्रीघराची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना आलाददायक वातावरण राहावे यासाठी २५ हजार रुपये खर्च करून रंगरंगोटी केली आहे. ज्या पद्धतीने ग्रामस्थ शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहे. त्याच प्रमाणात शाळाही गावासाही अनेक उपक्रम राबवित आहे. यामध्ये परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शिबिर, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, दर गुरुवारी रामधून व गावस्वच्छता उपक्रमात सक्रीय सहभाग, महिलांसाठी हळदीकुंकू आदी उपक्रम शाळा स्वत:हून राबवित आहे. अंगणवाडीपासून विद्यार्थ्यांचा पाया मजबुत होत आहे. शाळेतील या उपक्रमातून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळत आहे. शाळेच्या जडणघडनीमध्ये ग्रामस्थ सहभाग घेत आहे. यात वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, उपाध्यक्ष सुशिला धोटे, सरपंच संभाजी खेकारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर धोटे यांच्यासह मुख्याध्यापक धनराज गेडाम प्रयत्नशिल आहे. यांच्या प्रयत्नातून आज घडीला शाळेत दरमहिन्यात चावडीवाचन, कथाकथन, बुलबुल कब, बालआनंद मेळावा आयोजित करण्यात येत आहे.