शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

भद्रावती येथील प्लॉटधारकांना न्याय

By admin | Updated: May 12, 2016 01:05 IST

गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे.

आखीव पत्रिका मिळणार : ४७ वर्षांपासून सुरू होता संघर्षभद्रावती : गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सुमारे ४७ वर्षांपूर्वी बेघर व्यक्तींना सरकारने त्या काळात असलेल्या जागेच्या भावानुसार रक्कम आकारुन भूमीस्वामी हक्काने प्लॉट वाटप करुन पट्टे दिले होते. त्यात प्लॉट १० वर्षांपर्यंत विकता येणार नाही व एक वर्षांच्या आत घर बांधून वहिवाट करावी, या दोन अटी टाकण्यात आल्या होत्या. त्या अटींचे प्लॉटधारकांनी काटेकोरपणे पालनही केले.या भूखंडात एकूण ५५ प्लॉटधारक आहेत. परंतु या प्लॉटधारकांची पटवारी रेकॉर्ड, भूमी अभिलेख, तहसील कार्यालय, नगर परिषद, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद नव्हती. त्यामुळे अनेकदा लिखापढीे करुनही त्यांना न्याय मिळाला नाही. मालकी हक्क नसल्यामुळे शासकीय योजनेपासून तसेच बँकेच्या तारण योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागले. शोधाशोध करतानाच सदर भूखंड कै. माधव पाटील यांच्या नावे असल्याचा पुरावा मिळाला. याच भूखंडावर गावठाण होते. काही काळाने हे गावठाण उठून पडीत असलेली जागा शासनाने आपल्या ताब्यात घेवून त्यावेळच्या ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीमुळे त्याचे प्लॉट पाडले. ५५ प्लॉट गरजूंना जुजबी मोबदला घेवून व काहींकडून १०० रुपयांचे राष्ट्रीय बचत रोखे काढून वाटप केले. परंतु संबंधित कोणत्याही याबाबत कार्यालयात नोंद केली नाही. त्यामुळे या भूखंडावर रहात असलेले रहिवाशी संघटित होवून आपल्या मालकी हक्कासाठी लढू लागले. या भूखंडास आज शिवाजीनगर असे संबोधले जाते. येथील सर्व रहिवाशांनी एकत्र येवून संघर्ष समितीची स्थापना केली. २६ डिसेंबर २०१४ ला तालुका कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भद्रावतीच्या नावे आखिव पत्रिका देण्यासंबंधीचे पत्र नजरेस पडले. त्याचीच प्रेरणा घेऊन संबंधित प्लॉटधारकांनी पाठपुरावा केला. ४७ वर्षानंतर प्लॉटधारकांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.