शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जंगलातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:40 IST

मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देवनविभागाची उदासीनता : पाण्यासाठी भटकणाऱ्या चार रानटी डुकरांचा गेला बळी

सुरेश रंगारी।आॅनलाईन लोकमतकोठारी : मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे. जंगलातील पाणवठे, नाले व बंधारे कोरडे पडण्यास सुरूवात झाली असून पाण्यासाठी वन्यप्राणी, पक्षी भटंकती करीत आहेत. कोठारी, तोहोगाव रस्त्यावर असेच पाण्यासाठी भटकणाºया चार रानटी डुकरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यामुळे वनविभागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.कोठारी, झरण, तोहोगाव, कन्हारगाव व धाबा वनपरिक्षेत्रात पानवठे, बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील पाणी आटले असून नैसर्गिक नाल्यातही पाण्याचे अत्यल्प प्रमाण आहे. मानवनिर्मित कृत्रिम पानवठ्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी पाणी साठविल्या जात होते. आता त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भ्रमंती करीत पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेताना दिसून येत आहेत. मात्र जंगलातील नालेही कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची मोठी गैरसोय होत आहे. वनविभागाने जंगलात सिमेंट बंधारे, गॅबीन बंधारे बांधले आहेत. मात्र चुकीच्या ठिकाणी व निकृष्ट बंधारे बांधण्यात आल्याने त्यात पाणी जमा होत नाही. उलट शेकडो बंधारे, पानवठे निकामी झाले आहेत. यासाठी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी उधळला गेला आहे. वन्यप्राण्यांसाठी पाण्यासाठी जंगलातून गावाच्या दिशेने धाव घेत असताना रस्ता ओलांडताना अपघात होवून जीव जात आहेत.जंगलात वनविकास महामंडळ व वनविभागाकडून अनेक पानवठे तयार करण्यात आले असून त्याच्या शेजारी लाखो रुपये खर्चून कुपनलिका व सौर उर्जेवर चालणारे संयंत्र बसविण्यात आले. त्याचे पाणी पानवठ्यात सोडण्याची सोय करण्यात आली. मात्र ते सर्व बंद असून त्याचे साहित्य चोरीला गेले आहे. त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने त्याद्वारे पानवठ्यात पाणी पोहचू शकत नाही. परिणामी शासनाचा त्यावरील निधी व्यर्थ गेला असून वनाधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे वन्यप्राणी पाण्यावाचून जीव गमावत आहेत.जंगलातील कोरड्या पानवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था वनाधिकाऱ्यांनी करावी. तसेच नादुरुस्त पानवठे, बंधारे, सौर उर्जा पंप याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.