शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

जंगलातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:40 IST

मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देवनविभागाची उदासीनता : पाण्यासाठी भटकणाऱ्या चार रानटी डुकरांचा गेला बळी

सुरेश रंगारी।आॅनलाईन लोकमतकोठारी : मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे. जंगलातील पाणवठे, नाले व बंधारे कोरडे पडण्यास सुरूवात झाली असून पाण्यासाठी वन्यप्राणी, पक्षी भटंकती करीत आहेत. कोठारी, तोहोगाव रस्त्यावर असेच पाण्यासाठी भटकणाºया चार रानटी डुकरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यामुळे वनविभागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.कोठारी, झरण, तोहोगाव, कन्हारगाव व धाबा वनपरिक्षेत्रात पानवठे, बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील पाणी आटले असून नैसर्गिक नाल्यातही पाण्याचे अत्यल्प प्रमाण आहे. मानवनिर्मित कृत्रिम पानवठ्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी पाणी साठविल्या जात होते. आता त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भ्रमंती करीत पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेताना दिसून येत आहेत. मात्र जंगलातील नालेही कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची मोठी गैरसोय होत आहे. वनविभागाने जंगलात सिमेंट बंधारे, गॅबीन बंधारे बांधले आहेत. मात्र चुकीच्या ठिकाणी व निकृष्ट बंधारे बांधण्यात आल्याने त्यात पाणी जमा होत नाही. उलट शेकडो बंधारे, पानवठे निकामी झाले आहेत. यासाठी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी उधळला गेला आहे. वन्यप्राण्यांसाठी पाण्यासाठी जंगलातून गावाच्या दिशेने धाव घेत असताना रस्ता ओलांडताना अपघात होवून जीव जात आहेत.जंगलात वनविकास महामंडळ व वनविभागाकडून अनेक पानवठे तयार करण्यात आले असून त्याच्या शेजारी लाखो रुपये खर्चून कुपनलिका व सौर उर्जेवर चालणारे संयंत्र बसविण्यात आले. त्याचे पाणी पानवठ्यात सोडण्याची सोय करण्यात आली. मात्र ते सर्व बंद असून त्याचे साहित्य चोरीला गेले आहे. त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने त्याद्वारे पानवठ्यात पाणी पोहचू शकत नाही. परिणामी शासनाचा त्यावरील निधी व्यर्थ गेला असून वनाधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे वन्यप्राणी पाण्यावाचून जीव गमावत आहेत.जंगलातील कोरड्या पानवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था वनाधिकाऱ्यांनी करावी. तसेच नादुरुस्त पानवठे, बंधारे, सौर उर्जा पंप याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.