शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जंगलातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:40 IST

मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देवनविभागाची उदासीनता : पाण्यासाठी भटकणाऱ्या चार रानटी डुकरांचा गेला बळी

सुरेश रंगारी।आॅनलाईन लोकमतकोठारी : मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे. जंगलातील पाणवठे, नाले व बंधारे कोरडे पडण्यास सुरूवात झाली असून पाण्यासाठी वन्यप्राणी, पक्षी भटंकती करीत आहेत. कोठारी, तोहोगाव रस्त्यावर असेच पाण्यासाठी भटकणाºया चार रानटी डुकरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यामुळे वनविभागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.कोठारी, झरण, तोहोगाव, कन्हारगाव व धाबा वनपरिक्षेत्रात पानवठे, बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील पाणी आटले असून नैसर्गिक नाल्यातही पाण्याचे अत्यल्प प्रमाण आहे. मानवनिर्मित कृत्रिम पानवठ्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी पाणी साठविल्या जात होते. आता त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भ्रमंती करीत पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेताना दिसून येत आहेत. मात्र जंगलातील नालेही कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची मोठी गैरसोय होत आहे. वनविभागाने जंगलात सिमेंट बंधारे, गॅबीन बंधारे बांधले आहेत. मात्र चुकीच्या ठिकाणी व निकृष्ट बंधारे बांधण्यात आल्याने त्यात पाणी जमा होत नाही. उलट शेकडो बंधारे, पानवठे निकामी झाले आहेत. यासाठी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी उधळला गेला आहे. वन्यप्राण्यांसाठी पाण्यासाठी जंगलातून गावाच्या दिशेने धाव घेत असताना रस्ता ओलांडताना अपघात होवून जीव जात आहेत.जंगलात वनविकास महामंडळ व वनविभागाकडून अनेक पानवठे तयार करण्यात आले असून त्याच्या शेजारी लाखो रुपये खर्चून कुपनलिका व सौर उर्जेवर चालणारे संयंत्र बसविण्यात आले. त्याचे पाणी पानवठ्यात सोडण्याची सोय करण्यात आली. मात्र ते सर्व बंद असून त्याचे साहित्य चोरीला गेले आहे. त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने त्याद्वारे पानवठ्यात पाणी पोहचू शकत नाही. परिणामी शासनाचा त्यावरील निधी व्यर्थ गेला असून वनाधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे वन्यप्राणी पाण्यावाचून जीव गमावत आहेत.जंगलातील कोरड्या पानवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था वनाधिकाऱ्यांनी करावी. तसेच नादुरुस्त पानवठे, बंधारे, सौर उर्जा पंप याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.