शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

महाआॅनलाईनकडून डाटा एंट्री आॅपरेटरची थट्टा

By admin | Updated: May 11, 2014 00:12 IST

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती शासनाला त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून महाआॅनलाईन कंपनीने प्रत्येक तालुक्यात

 चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती शासनाला त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून महाआॅनलाईन कंपनीने प्रत्येक तालुक्यात डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायत संगणकीकृत केली जात आहे. मागील काही दिवसांपासून १९६९ पासूनची जन्म-मृत्यूची नोंदणीही आता डाटा एंट्री आॅपरेटरमार्फत करून घेण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक आॅपरेटरला दिवसाला १०० एंट्री करण्याचे आदेश पंचायत समितीकडून दिले आहे. त्यामुळेच अनेक आॅपरेटरला न्याहारीवरच अख्खी रात्र पंचायत समितीमध्ये काढावी लागत आहे. डाटा एंट्री आॅपरेटरवर होणारा अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिला आहे. महाआॅनलाईन कंंपनीने संग्राम सॉफ्टमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत संगणीकृत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी महाआॅनलाईनवर कंपनीने प्रत्येक तालुक्यात डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती केलेली आहे. मूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ४३ डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत दाखले देण्याचे काम सुरू आहे. २८ एप्रिलपासून प्रत्येक ग्रामपंचायतीमधील संगणक आता पंचायत समितीच्या सभागृहात आणून ठेवलेले आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री आॅपरेटरला आता पंचायत समितीमध्ये बोलावून त्यांच्याकडून सन १९६९ पासूनच्या जन्म मृत्यूच्या नोंदी संगणकावर एंट्री करण्याचे काम सोपविण्यात आलेले आहे. दिवसातून किमान १०० एंट्री करणे प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आलेले असल्यामुळे काही आॅपरेटरला नोंदणी करण्यासाठी उशीर होत आहे. अशावेळी केवळ नास्त्यावरच रात्र पंचायत समितीमध्येच काढावी लागत आहे. ही बाब श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी माहीत होताच त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन आॅपरेटरची भेट घेतली. तेव्हा हे भीषण वास्तव्य समोर आलेले आहे. सदर आॅपरेटर हे सुमारे २० ते २५ किमी अंतरावरुन पंचायत समितीमध्ये एंट्री करण्यासाठी येतात. त्यांना पंचायत समितीकडून ना प्रवास भत्ता दिला जातो, ना भोजनाची व्यवस्था केली आहे. प्रत्येकांना स्वत: हा खर्च करावा लागत आहे. केवळ ३८०० रुपये मानधन घेऊन हे डाटा एंट्री आॅपरेटर काम करीत आहे. (शहर प्रतिनिधी)