शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

न्यायाधीशांमध्ये अंतर्मनातून प्रामाणिकपणा असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे व्यासपीठावर विराजमान होते.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। टहलियानी यांचे प्रतिपादन, चंद्रपूर प्रेस क्लबतर्फे मदनलाल टहलियानी यांना ‘चंद्रपूर गौरव’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : न्यायाधीशांना कायद्याचे ज्ञान कमी असले तरी चालू शकते, मात्र ते अंतर्मनाने प्रामाणिक असले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे लोकायुक्त मदनलाल टहलियानी यांनी शनिवारी येथे केले. चंद्रपूर प्रेस क्लबच्या वतीने शनिवारी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्यात लोकायुक्त मदनलाल टहलियानी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘चंद्रपूर गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे व्यासपीठावर विराजमान होते. सत्कारमूर्ती व आज चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्याने सन्मानित मदनलाल टहलियानी यांनी आजचा सत्कार मूल आणि चंद्रपूर येथील समस्त जनतेला समर्पित केला. या सोहळ्यात चंद्रपूर येथील आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या ४० वर्षांपासून वृत्तपत्र वाटप करणाऱ्या क्षेत्रात काम करणाºया वसंता चेनलवार, पुंडलिक दखणे, मारोती धाबेकर या हॉकर्सचा सत्कार करण्यात आला. वंदना दखणे या वृत्तपत्र वाटप करणाऱ्या भगिनीचा सत्कार विशेष उल्लेखनीय ठरला.आमदार मुनगंटीवार म्हणाले, टहलियानी म्हणजेच प्रामाणिकपणा आणि हाच प्रामाणिकपणा त्यांनी आपल्या न्यायदानाच्या दायित्वामध्ये दाखवून दिला. जग बदलणे अतिशय सोपे आहे. मात्र त्याची सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अशोक वानखडे म्हणाले, कोणाच्या दबावात काम करणे हा पत्रकारांचा स्वभाव असू शकत नाही. अशा प्रकारच्या दबावाचे वर्णन करणारे व पळवाट काढणारे पत्रकार असू शकत नाही. तुमचे ऐकायला समाज तयार आहे. तुम्हाला दाद द्यायला यंत्रणा तयार आहे. तुम्ही बोलणे मात्र सोडू नका. व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणे. सातत्याने सुरू ठेवा. कारण ती तुमची ओळख आहे. ती समाजाची आपल्याकडून अपेक्षाही आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक संजय तायडे यांनी तर संचालन संजय रामगिरवार, आभार रवींद्र जुनारकर यांनी मानले.प्रहार करण्याची ताकत माध्यमांमध्ये - विजय वडेट्टीवारलोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारितेचे महत्त्व अबाधित आहे. आजच्या काळाची तुलना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीशी होऊ शकत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषितांसाठी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या विचारांची होऊ शकत नाही. पण आजच्या समाजव्यवस्थेला अनावश्यक असणाºया विचारांवर प्रहार करण्याची ताकद आजही माध्यमांमध्ये आहे, असे विचार ना. विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार