शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हक्काच्या एसटीतही ‘सावित्रीं’चा उभ्याने प्रवास

By admin | Updated: September 30, 2016 01:16 IST

देशात सर्वदूर कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवून निरक्षरतेचे प्रमाण नाहीसे करण्यासाठी,

वाहकांचेही दुर्लक्ष : एसटी महामंडळ नियंत्रणहीनगोंडपिंपरी : देशात सर्वदूर कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवून निरक्षरतेचे प्रमाण नाहीसे करण्यासाठी, शासनाने शर्तीचे प्रयत्न चालविले आहे. मुलींना शिक्षणाच्या सोयी सुलभतेने उपलब्ध व्हावेत, यासाठी मोफत एस.टी. पास योजनेसह शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत प्रवास एस.टी.ची ही व्यवस्था केली आहे. मात्र चालविण्यात येणाऱ्या हक्काच्या एसटीत विद्यार्थिनींना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याचा प्रकार दिसत आहे.शासनाने मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत एस.टी. प्रवास योजना सुरू केली. ही योजना खास विद्यार्थिनींसाठी अमलात आणली. तर एस.टी. बस सांभाळ वेळापत्रक तथा चालविण्याची जबाबदारी शासनाने राज्य परिवहन मंडळाकडे सोपविली. मानव विकास योजनेअंतर्गत शालेय वेळापत्रकानुसार सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस यातील प्रवासी आसने हे खास विद्यार्थिनींसाठी आरक्षित असतानाही अनेक प्रवासीच त्या असाणावर बसतात. यानंतर मात्र चढणाऱ्या विद्यार्थिनींना जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी असलेले वाहक हे आपले कर्तव्य झटकून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत नाही. त्यामुळे त्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. यामुळे शाळकरी विद्यार्थिनींना एस.टी.तील गर्दी पाहून काही तरुणांकडून नको ते टॉटींग केली जाते. तर गर्दीत बिचाऱ्या सावित्रीच्या लेकींना नको त्याही परिस्थितीत उतरणाऱ्यांचे धक्के खावे लागते. सदर प्रकार गंभीर असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन अनुचित प्रकार घडणार नाही. याकडे एसटी महामंडळाने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)