शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पत्रकारांनी निर्भयपणे लिखाण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:11 IST

विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन या तिन्ही स्तभांना टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाने निर्भयपणे लिखाण करावे.

ठळक मुद्देनाना पटोले : चंद्रपुरात पत्रकार दिनाचा कार्यक्रम

चंद्रपूर : विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन या तिन्ही स्तभांना टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाने निर्भयपणे लिखाण करावे. पत्रकारांनी समाजाचा खरा चेहरा शासनापुढे मांडावा. पत्रकारांनी पत्रकारितेची ताकद कदापि कमी होऊ देवू नये, असे मत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी स्थानिक मराठी पत्रकार भवनात पार पडलेल्या पत्रकार दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षपदी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य चेतन भैरम, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, मुरली मनोहर व्यास, अ‍ॅड. एकनाथ साळवे, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, श्रीपाद जोशी, अंबिका दवे आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, समाजसेवक रामभाऊ वैरागडे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सत्यनारायण तिवारी यांना सेवावृत्ती पुरस्कार, राजुराचे प्रेस फोटोग्राफर अविनाश दोरखंडे यांना स्मृती पुरस्कार इरफान शेख यांना झेप गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर पत्रकारांसाठी आयोजित विविध स्पर्धेचे वितरण करण्यात आले. यावेळी अनिल पाटील यांना शोधवार्ता पुरस्कार, ग.म. शेख यांना पर्यावरण पुरस्कार, पिंपळगाव ब्रह्मपुरीचे रवि शेंडे यांना शैक्षणिक संस्था विकास वार्ता पुरस्कार देवून पुरस्कृत करण्यात आले.संचालन मोरेश्वर राखुंडे प्रास्ताविक विनोदसिंह ठाकूर तर उपस्थिताचे आभार सुनील तिवारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.