शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पत्रकारिता समाजाचा आरसा आहे

By admin | Updated: January 10, 2017 00:49 IST

पत्रकारितेच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची रेलचेल आहे. तरीही मुद्रीत साहित्यातील वर्तमान पत्राचे महत्त्व कमी झाले नाही.

हरीश शर्मा : बल्लारपुरात मान्यवरांचा सत्कार समारंभबल्लारपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची रेलचेल आहे. तरीही मुद्रीत साहित्यातील वर्तमान पत्राचे महत्त्व कमी झाले नाही. वाचक वर्ग वर्तमानपत्रातील बातम्यावर विश्वास ठेवून आहे. पत्रकारांनी विकासात्मक व समाजाभिमुख लेखन करणे अपेक्षित आहे. पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे समाजाचा आरसा आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा यांनी शुक्रवारी येथे केले.बल्लारपूर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्यसाधून स्थानिक श्री संत तुकाराम महाराज सभागृहात चित्र रंगभरण स्पर्धा, सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण, राजकीय व शासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शर्मा बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र आर्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन जुनोनकर, प्रसिद्ध लेखक आशिष देव, सत्कारमुर्ती माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, कवी मनोज बोबडे, सामाजिक कार्यकर्ता आलोक साळवे यांंची उपस्थिती होती.यावेळी आशिष देव म्हणाले, आज घडीला पत्रकारितेच्या क्षेत्रात बदल घडत आहेत. नकारात्मक व सकारात्मक बातम्यात टष्ट्वंवटष्ट्वंव सुरू असल्याचे दिसून येते. एकच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळी प्रकाशित केली जाते. तरीही वर्तमानपत्र इतर माध्यमापेक्षा श्रेष्ठ असून विश्वहार्यता जोपासून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अनेकश्वर मेश्राम यांनी केले. संचालन प्रा. विजय सोरते यांनी तर आभार पद्माकर पांढरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय रासेकर, प्रशांत वैरागडे, रमेश निषाद, सुजय वाघमारे, विकास राजूरकर, प्रशांत रणदिवे, प्रशांत विघ्नेश्वर, अ‍ॅड. संजय बोराडे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)यांना करण्यात आले सम्मानितमहाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे, शासकीय क्षेत्रातील मुख्याधिकारी विपीन मुद्धा, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, साहित्य क्षेत्रातील मनोज बोबडे, सामाजिक कार्यासाठी आलोक साळवे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे आस्था गार्जलावार, चंदनकुमार शाह या विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुखमीत कौर, प्राचार्य भावना वेणू गोपाल, प्राचार्य पी. संतोषकुमार, कविता कंडे, रजिया खान, स्वाती बाबुळकर, सुरेखा चंदेल, डी.एल. जांभुळे, उज्वला येरमे, शितल वाघमारे, फरदाना कुरेशी, दीपाली चिवंडे, शैलेस येरणे, शिल्पा टिपले, रजनी वाळके यांचाही सत्कार करण्यात आला.