शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

जिवतीचे तहसील कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST

गुरुवारी जिवती येथील आठवडी बाजार असते. तहसीलची कामे आणि बाजारासाठी विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.

नागरिकांना नाहक त्रास : तहसीलदारांसह कर्मचारी येतात उशिराशंकर चव्हाण जिवतीयेथील महसुल विभागाचे कार्यालय म्हणजे ‘कुणीही या, अन् कधीही निघून जा’ अशीच स्थिती येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सेवा देण्यासाठी मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. मात्र मुख्यालयी राहणे तर सोडाच, पण वेळेवरही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उजेडात आला. सेतूतील हेराफेरी नागरिकांच्या मुळावरकार्यालयात असलेल्या सेतूचा हेतूच नागरिकांना कळेनासे झाले आहे. कुठलेही काम असो दाम दिल्याशिवाय काम होत नाही. त्यामुळे पहाडावरील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जनतेची कामे सुलभ व लवकर व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात कंत्राटदार पद्धतीने सेतूची निर्मिती केली. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्यांनी आपला व्यवसायच बनविला आहे. पैसे दिल्यावर काम लवकर होतात आणि एखाद्याने नाही दिले तर त्याला विविध कारणे सांगून हेलपाटे मारायला लावतात. अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्यात, मात्र कार्यवाही कुणावरही झाल्याचे दिसत नाही.कार्यालयात शुकशुकाटप्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता ११.३० वाजेपर्यंत तहसीलदार व नायब तहसीलदार कार्यालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या खुर्च्या रिकाम्या तर होत्याच पण इतर कर्मचारीही साहेब नसल्याचे कारण सांगून बाहेर गप्पा ठोकत होते. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

गुरुवारी जिवती येथील आठवडी बाजार असते. तहसीलची कामे आणि बाजारासाठी विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. आपली कामे लवकर व्हावी यासाठी नागरिकांनी कार्यालयाच्या वेळेतच मोठी गर्दी केली होती. मात्र ११.३० वाजले तरी अधिकाऱ्यांचा पत्ता नाही. दरवाज्याजवळ ताटकळत उभे असलेली नागरिक वैतागली होती. साहेब कधी येणार याकडे सर्वांचे चातकासारखे डोळे लागले होते. कार्यालयाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. इतर कर्मचारीही साहेब नसल्याचे कारण सांगून गप्पा ठोकण्यात मग्न होती. हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांसोबत नेहमीच घडत असतो. कधी तहसीलदारामुळे कामे अडकतात तर कधी पटवारी व लिपीकामुळे कामे रेंगाळली जातात. याचा त्रास होतो फक्त सर्वसामान्य नागरिकांना. जनतेची कामे वेळेवर व तातडीने व्हावी यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कुणीही मुख्यालयी राहत नाही. कर्मचारी राजुरा, गडचांदूर, चंद्रपूर येथून ये-जा करतात. त्यामुळे वेळेवर कुणीच येत नाही. कार्यालयात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण थांबावे, यासाठी शासनाने ‘थंब’ मशिन बसविली. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे पहाडावरील नागरिकांची कामे रेंगाळली असून एकाच कामासाठी वारंवार चकरा मारावे लागत आहे. संबंधित विभाग मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.