शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांनी जिवती तालुका बेजार

By admin | Updated: November 8, 2014 22:35 IST

निसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात

शंकर चव्हाण - जिवतीनिसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. याच तालुक्यात आंध्र-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. गैरआदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी अद्यापही संघर्ष सुरू आहे. या साऱ्या समस्यांबाबत शासन आणि प्रशासन अद्यापही गंभीर नाही. दिवसेंदिवस निसर्गाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. ‘निर्सग साथ देईना, उत्पन्न हातात येईना’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारासाठी गावेच्या गावे मुलांना सोबत घेऊन स्थलांतरित होत आहेत. तालुक्यात नागरिकांना रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग या तालुक्यात नाहीत. रोजगार हमीची कामेसुद्धा सुरू झाली नाहीत.दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या तालुक्यातील अनेक गावांत कुपोषणाचे प्रमाणही वाढत आहे. कुपोषणाच्या नावाखाली शासनाकडून अनुदान लाटणाऱ्या संस्थाही दिवाळखोरीत निघाल्या आहेत. एकीकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी अनेक योजना राबविल्यानंतरही जिवती तालुक्यात वीज, आरोग्य, रस्ते, पाणी, शेतकऱ्यांचा जमिनीचा मालकी हक्क, ५० वर्षांच्या वास्तव्याच्या पुराव्याअभावी जातीचा दाखला काढण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची फरफट आजही कायम आहे. या समस्या कधी सुटणार, अशा विवंचनेत जिवती तालुक्यातील नागरिक आहेत. (तालुका प्रतिनिधी)