शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

विविध समस्यांनी जिवती तालुका बेजार

By admin | Updated: November 8, 2014 22:35 IST

निसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात

शंकर चव्हाण - जिवतीनिसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. याच तालुक्यात आंध्र-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. गैरआदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी अद्यापही संघर्ष सुरू आहे. या साऱ्या समस्यांबाबत शासन आणि प्रशासन अद्यापही गंभीर नाही. दिवसेंदिवस निसर्गाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. ‘निर्सग साथ देईना, उत्पन्न हातात येईना’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारासाठी गावेच्या गावे मुलांना सोबत घेऊन स्थलांतरित होत आहेत. तालुक्यात नागरिकांना रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग या तालुक्यात नाहीत. रोजगार हमीची कामेसुद्धा सुरू झाली नाहीत.दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या तालुक्यातील अनेक गावांत कुपोषणाचे प्रमाणही वाढत आहे. कुपोषणाच्या नावाखाली शासनाकडून अनुदान लाटणाऱ्या संस्थाही दिवाळखोरीत निघाल्या आहेत. एकीकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी अनेक योजना राबविल्यानंतरही जिवती तालुक्यात वीज, आरोग्य, रस्ते, पाणी, शेतकऱ्यांचा जमिनीचा मालकी हक्क, ५० वर्षांच्या वास्तव्याच्या पुराव्याअभावी जातीचा दाखला काढण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची फरफट आजही कायम आहे. या समस्या कधी सुटणार, अशा विवंचनेत जिवती तालुक्यातील नागरिक आहेत. (तालुका प्रतिनिधी)