शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

जवाहर नवोदय विद्यालय बनले समस्याचे माहेरघर

By admin | Updated: July 17, 2014 00:00 IST

हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे.

नवरगाव : हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन, शुद्ध पाण्याचा अभाव, यामुळे विद्यार्थ्यांच्या आयोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पालकांनी केला असून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. केंद्र शासनाने हुशार होतकरु प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी सर्व सोईयुक्त प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती केली. त्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पोषण आहार, स्वच्छ पाणी, गणवेश, ताजी फळे, साबूण, आणि मुलांच्या आरोग्य तपासणीकरिता नर्स, उच्चप्रतिचे शिक्षण आदी सोयीसुविधा पुरविण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१२ च्या दरवाढीच्या पत्रकानुसार प्रति विद्यार्थी प्रति महिना मेस खर्च म्हणून बाराशे रुपये, गणवेश २ हजार रुपये नोटबुक ४०० रुपये दैनंदिन वापराच्या वस्तुसाठी एक हजार रुपये दिले जातात. परंतु तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाकडून निकृष्ठ दर्जाचे भोजन, त्यात कडक पोळ्या, दरवर्षी दोन गणवेश देण्याचा नियम असताना वेळेवर गणवेश दिले जात नाहीत. विद्यार्थी निवासाच्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे शौचालय- बाथरुममध्ये दुर्गंधी पसरली आहे. पुरेशे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी चार- चार दिवस आंघोळ करीत नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वर्षाभरापासून पीटीसी सभा घेण्यात आल्या नाही. शाळा परिसरातील कचऱ्याची साफसफाई, शौचालय, बाधरुमची साफसफाई विद्यार्थ्यांकडून केली जाते.विद्यालयात शिस्त नसल्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरी करतात. तसेच रॅगींग, मोबाईलचा सर्रास वापर नियमात नसतानाही होत आहे. याकडेही व्यवस्थापनाचे लक्ष नाही.पालकाकडून पीटीसी फंडात ९० हजार पेक्षा जास्त निधी गोळा करुनसुद्धा भौतिक सुविधेवर खर्च केला जात नाही. अशा नानाविध समस्या असताना सदर समस्येबाबत विद्यार्थ्यांनी कुठे वाच्यता केल्यास त्यांना धमकावून शारिरीक मानसिक छळ करुन शिक्षेचा वापर करुन शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. पालकासोबत तेथील कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत डॉ. रोहिणी खोब्रागडे व राजेश बोरकर यांनी केला असून सदर आशयाचे निवेदन ६३ पालकांच्या स्वाक्षरीनीशी जनशिकायत नवोदय विद्यालय समिती दिल्लीकडे दिले आहे. (वार्ताहर)