शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जवाहर नवोदय विद्यालय बनले समस्याचे माहेरघर

By admin | Updated: July 17, 2014 00:00 IST

हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे.

नवरगाव : हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन, शुद्ध पाण्याचा अभाव, यामुळे विद्यार्थ्यांच्या आयोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पालकांनी केला असून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. केंद्र शासनाने हुशार होतकरु प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी सर्व सोईयुक्त प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती केली. त्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पोषण आहार, स्वच्छ पाणी, गणवेश, ताजी फळे, साबूण, आणि मुलांच्या आरोग्य तपासणीकरिता नर्स, उच्चप्रतिचे शिक्षण आदी सोयीसुविधा पुरविण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१२ च्या दरवाढीच्या पत्रकानुसार प्रति विद्यार्थी प्रति महिना मेस खर्च म्हणून बाराशे रुपये, गणवेश २ हजार रुपये नोटबुक ४०० रुपये दैनंदिन वापराच्या वस्तुसाठी एक हजार रुपये दिले जातात. परंतु तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाकडून निकृष्ठ दर्जाचे भोजन, त्यात कडक पोळ्या, दरवर्षी दोन गणवेश देण्याचा नियम असताना वेळेवर गणवेश दिले जात नाहीत. विद्यार्थी निवासाच्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे शौचालय- बाथरुममध्ये दुर्गंधी पसरली आहे. पुरेशे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी चार- चार दिवस आंघोळ करीत नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वर्षाभरापासून पीटीसी सभा घेण्यात आल्या नाही. शाळा परिसरातील कचऱ्याची साफसफाई, शौचालय, बाधरुमची साफसफाई विद्यार्थ्यांकडून केली जाते.विद्यालयात शिस्त नसल्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरी करतात. तसेच रॅगींग, मोबाईलचा सर्रास वापर नियमात नसतानाही होत आहे. याकडेही व्यवस्थापनाचे लक्ष नाही.पालकाकडून पीटीसी फंडात ९० हजार पेक्षा जास्त निधी गोळा करुनसुद्धा भौतिक सुविधेवर खर्च केला जात नाही. अशा नानाविध समस्या असताना सदर समस्येबाबत विद्यार्थ्यांनी कुठे वाच्यता केल्यास त्यांना धमकावून शारिरीक मानसिक छळ करुन शिक्षेचा वापर करुन शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. पालकासोबत तेथील कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत डॉ. रोहिणी खोब्रागडे व राजेश बोरकर यांनी केला असून सदर आशयाचे निवेदन ६३ पालकांच्या स्वाक्षरीनीशी जनशिकायत नवोदय विद्यालय समिती दिल्लीकडे दिले आहे. (वार्ताहर)