शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

जटपुरा गेट ते रेल्वे पूल दरवाढ @ ३४०० रुपये

By admin | Updated: April 24, 2017 01:00 IST

शासनाने नवीन आर्थिक वर्षांत चंद्रपूर शहरातील विविध भागातील भूखंडांचे वार्षिक बाजारमूल्य घोषित केले आहे.

भाव कडाडले : चंद्रपुरात भूखंडांच्या बाजारमूल्यात सरासरी चार टक्के वाढचंद्रपूर : शासनाने नवीन आर्थिक वर्षांत चंद्रपूर शहरातील विविध भागातील भूखंडांचे वार्षिक बाजारमूल्य घोषित केले आहे. त्यामध्ये भूखंडांची सरासरी चार टक्के वाढ करण्यात आली आहे. जटपुरा गेट ते रेल्वे पूल मार्गाच्या आतील भागातील भूखंडाची शहरात सर्वाधिक दरवाढ ३ हजार ४०० रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आली आहे. या शासकीय दरवाढीपेक्षा खुल्या बाजारातील भाव अधिक आहेत.शासनाकडून दरवर्षी बार्षिक बाजारमूल्य दर तक्ता जाहीर करण्यात येत असतो. भूखंडांची होणारी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून ही दरवाढ ठरविली जाते. १ एप्रिलपासून नवीन भूखंड दरवाढ लागू करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते महात्मा गांधी मार्ग हा बाजार मूल्यामध्ये सर्वाधिक महागडा ठरला आहे. जुना दर ५५ हजार ९०० चौरस मीटर होता. तो आता ५७ हजार २० रुपये झाला आहे. हा खुल्या बाजारातील दर त्यापेक्षाही अधिक आहे. परंतु नवीन वार्षिक बाजार मूल्यामध्ये जटपुरा गेट ते रेल्वे पूल रस्त्याच्या आतील भूखंडांनी भाव खाल्ला आहे. या मुख्य रस्त्यालगतच्या भूखंडांचा जुना दर प्रती चौरस मीटर ४६ हजार रुपये होता. तो आता ४६ हजार ९२० रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आला आहे. याच मार्गावरील आतील भूखंड यापूर्वी १३ हजार ९०० रुपये चौरस मीटर दराने शासकीय शुल्क आकारणी केली जात होती. आता तो दर १७ हजार ३०० चौरस मीटर झाला आहे. त्यानुसार, ३ हजार ४०० रुपये म्हणजे तब्बल २४ टक्के दरवाढ झाली आहे. शहराचा विस्तार वरोरा, बल्लारपूर-मूल मार्गावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन भूखंड याच मार्गावर उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्या भागात मागणी अधिक आहे. वरोरा मार्गावर मुख्य रस्त्यावरील एका भागात जुना दर २७ हजार ७२० रुपये चौरस मीटर होता. तो आता २८ हजार २७० चौरस मीटर करण्यात आला आहे. दुसऱ्या भागात जुना दर २४ हजार ४०० रुपये होता. तो आता २७ हजार ७०० रुपये करण्यात आला आहे. त्यानुसार, ही दरवाढ १३.५ टक्के झाली आहे. मूल-बल्लारपूर बायपास रस्त्यावरील भूखंडाचा जुना दर १२ हजार १४० रुपये होता. तर नवीन दर १३ हजार ४०० रुपये झाला आहे. तसेच याच मार्गावर आतमधील भूखंडाचा जुना दर १० हजार ५०० रुपये होता. तो आता १० हजार ७१० रुपये झाला आहे. (प्रतिनिधी)दाताळामध्ये शेतीचा भाव हेक्टरी १४ लाख ७ हजार रुपयेशहरालगत असलेल्या आणि मनपा क्षेत्रात येणाऱ्या दाताळा येथे शेत जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्यात हेक्टरी २८ हजार १५० रुपये दरवाढ करण्यात आली आहे. जुना दर १४ लाख ७ हजार ६०० रुपये होता. तो आता १४ लाख ३५ हजार ७५० रुपये करण्यात आला आहे. चंद्रपूर तालुक्यात जिरायती शेतीचा हेक्टरी ४ लाख ६२ हजार रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. एनए जमीन, हाय-वे आणि गावठाण भूखंडात किंचित दरवाढ करण्यात आली आहे. एनए जमिनीचे दर ७९० रुपयावरून ८३० रुपये झाले आहेत. हाय-वेवरील भूखंड ८७०-९९० रुपयांवरून ९१०-१०४० रुपये आणि गावठाण जमीन ९१०-१०४० रुपयांवरून ९६०-१०९० रुपयांपर्यंत वाढले आहेत. महागड्या भूखंडांचे क्षेत्रकस्तुरबा रस्त्यावरील भूखंडाचा ५१ हजार रुपये चौरस मीटर दर आहे. विनबा रस्ता ३५ हजार ९० रुपये, जटपुरा गेट ते महात्मा गांधी चौक ५७ हजार २० रुपये, महात्मा गांधी रस्ता ४४ हजार ३४० रुपये, वरोरा रस्ता वडगाव १२ हजार रुपये याप्रमाणे नवीन चौरस मीटरचे दर आहेत. नोंदणी शुल्काला ३० हजारांची मर्यादा भूखंडांची रजिस्ट्री करताना महत्तम मर्यादा ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये महत्तम ३० हजार रुपये नोंदणी फी भरावी लागेल. भूखंड अधिक किंमतीचा असून त्यानुसार नोंदणी फी ३० हजार रुपयांपेक्षा अधिक असली तरीही त्या खरेदीदाराला ३० हजार रुपयेच भरावे लागतील. परंतु मुद्रांक शुल्कासाठी कोणतीही मर्यादा नाही. भूखंडाचे वार्षिक दरानुसार मूल्यांकन होईल. त्यानंतर आलेल्या मूल्यावर मनपा क्षेत्रात ६ टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागेल. ते नगर परिषद क्षेत्रात ५ टक्के आणि ग्रामीण क्षेत्रात ४ टक्के दराने भरावे लागेल. त्यामध्ये आणखी १ टक्का दराने नोंदणी शुल्क लागेल.