शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

चंद्रपूर, बल्लारपुरात ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची माहिती देवून ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता मांडली होती.

ठळक मुद्देआजपासून चार दिवस ठप्प : रूग्णालय, औषधालय सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असल्याने कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी चंद्र्रपूर महानगरपालिका क्षेत्र व दुर्गापूर, पडोली, ऊर्जानगर तसेच बल्लारपूर शहरात १० सप्टेंबर गुरूवार ते १३ सप्टेंबर रविवारपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची माहिती देवून ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता मांडली होती. चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, चंद्रपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री व सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनीही शहरातील स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सरनाईक आदींनी मते जाणून घेतली. त्यानंतर जनता कर्फ्यू लावण्यावर सर्वांचे एकमत झाले.बल्लारपुरात नऊ पथक सज्जजनता कर्फ्यू कालावधीत प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी बल्लारपुरात महसूल, पोलीस व नगर परिषद प्रशासनाकडून नऊ पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हाळे, मुख्याधिकारी विजयकुमार नाईक, तहसीलदार जयंत पोहनकर, ठाणेदार एस. एस. भगत यांच्या उपस्थितीत बुधवारी व्यापारी, सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींची बैठक झाली.चंद्रपुरातील सीए कार्यालये बंदचंद्रपूर चार्टर्ड अकाऊंन्टट असोसिएशननेही कोरोनाविरूद्ध १० ते २० सप्टेंबरपर्यंत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे. यावेळी सीए असोसिएशनचे दामोधर सारडा, रमेश मामीडवार, अंजुम गौस, सौरभ खोसला, शादाब चिनी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरकरांनी घेतलेला ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय योग्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन चंद्रपूर सीए असोसिएशनने केले आहे.काय सुरू राहणार ?सर्व रूग्णालये, औषधालये, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापना, वेकोलि सुरू राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहणार आहे. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद ठेवण्यात आले आहे.सराफा बाजार आठ दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून चंद्रपुरातील सराफा व्यावसायिकांनी बुधवारपासून स्वत:हून ‘लॉकडाऊन’ सुरू केले. १६ सप्टेंबरपर्यंत सराफा प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी शहरातील सराफा दुकाने बंद होती. त्यामुळे सराफा दुकानांसमोर शुकशुकाट होता.काय बंद राहणार ?चंद्रपूर मनपा क्षेत्र व दुर्गापूर, पडोली, उर्जानगर तसेच बल्लारपूर शहरातील सर्व किराणा, भाजी, फळे दुकाने, पान ठेले, चहा टपऱ्या व फुटपाथवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. जनतेने विनाकारण घराबाहेर निघू नये, मास्क वापरावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.