शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

चिमूर तालुक्यातील शिवारात होणार ‘जलक्रांती’

By admin | Updated: April 19, 2017 00:47 IST

ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली.

जलयुक्त शिवाराची ७४५ कामे पूर्ण : आढावा बैठकचिमूर : ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या जलयुक्त शिवारातील मसगी मामा तलाव इत्यादी कामातून चिमूर तालुक्यातील शिवारात जलक्रांती होणार आहे.चिमूर तालुक्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तालुक्यात असलेल्या मसगी नाला खोलीकरण, बंधारे, मामा तलाव दुरुस्ती, पंचायत समितीतंर्गत शेततळे या कामाचा जलयुक्त शिवारात समावेश आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवारावर करण्यात येणारा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत जलयुक्त शिवाराच्या कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवले जात आहे.चिमूर विधानसभा क्षेत्रातील समाविष्ठ चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाची आढावा बैठक नुकतीच चिमूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आढावा सभेत चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, चिमूरचे तहसीलदार संतोष महले, नागभीडचे तहसीलदार समीर माने, संवर्ग विकास अधिकारी एम.बी. डोंगरे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे, कृषी अधिकारी एम.पी. पवार, यांच्यासह इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ या सत्रात २२ गावाचा समावेश करण्यात आला होता. त्यास १४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. सन २०१६-१७ या वर्षात २७ गावांसाठी सहा कोटी ८८ लाख तर २०१७-१८ या वर्षामध्ये २४ गावांचा समावेश करण्यात आला. या कामासाठी आतापर्यंत २१ कोटी २६ लाख रुपयांचा निधी खर्च करून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये ९४५ कामे प्रस्तावित होती .आतापर्यंत ७८५ कामे पूर्ण करण्यात आली. तर ८१९ कामे प्रगती पथावर आहेत. या कामामध्ये कृषी विभागातर्फे ७२७ कामे पंचायत समिती मनरेगा १६ कामे, जि.प. सिंचाई विभागातर्फे १४ कामे जलसंधारण लघू सिंचन २३ कामे व वनविभागातील २६६ कामे आहेत.आढावा सभेतून जलयुक्त शिवाराच्या कामाला गती देवून काम योग्य पद्धतीने वेळेवर पूर्ण करण्याच्या सुचना देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या सुचना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चिमूर तालुक्यात होणाऱ्या या जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे गावागावातील शिवारात जलक्रांती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)