शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

चिमूर तालुक्यातील शिवारात होणार ‘जलक्रांती’

By admin | Updated: April 19, 2017 00:47 IST

ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली.

जलयुक्त शिवाराची ७४५ कामे पूर्ण : आढावा बैठकचिमूर : ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या जलयुक्त शिवारातील मसगी मामा तलाव इत्यादी कामातून चिमूर तालुक्यातील शिवारात जलक्रांती होणार आहे.चिमूर तालुक्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तालुक्यात असलेल्या मसगी नाला खोलीकरण, बंधारे, मामा तलाव दुरुस्ती, पंचायत समितीतंर्गत शेततळे या कामाचा जलयुक्त शिवारात समावेश आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवारावर करण्यात येणारा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत जलयुक्त शिवाराच्या कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवले जात आहे.चिमूर विधानसभा क्षेत्रातील समाविष्ठ चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाची आढावा बैठक नुकतीच चिमूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आढावा सभेत चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, चिमूरचे तहसीलदार संतोष महले, नागभीडचे तहसीलदार समीर माने, संवर्ग विकास अधिकारी एम.बी. डोंगरे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे, कृषी अधिकारी एम.पी. पवार, यांच्यासह इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ या सत्रात २२ गावाचा समावेश करण्यात आला होता. त्यास १४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. सन २०१६-१७ या वर्षात २७ गावांसाठी सहा कोटी ८८ लाख तर २०१७-१८ या वर्षामध्ये २४ गावांचा समावेश करण्यात आला. या कामासाठी आतापर्यंत २१ कोटी २६ लाख रुपयांचा निधी खर्च करून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये ९४५ कामे प्रस्तावित होती .आतापर्यंत ७८५ कामे पूर्ण करण्यात आली. तर ८१९ कामे प्रगती पथावर आहेत. या कामामध्ये कृषी विभागातर्फे ७२७ कामे पंचायत समिती मनरेगा १६ कामे, जि.प. सिंचाई विभागातर्फे १४ कामे जलसंधारण लघू सिंचन २३ कामे व वनविभागातील २६६ कामे आहेत.आढावा सभेतून जलयुक्त शिवाराच्या कामाला गती देवून काम योग्य पद्धतीने वेळेवर पूर्ण करण्याच्या सुचना देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या सुचना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चिमूर तालुक्यात होणाऱ्या या जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे गावागावातील शिवारात जलक्रांती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)