शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:42 IST

देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राजुरा-कोरपना सीमावर्ती भागातील गावे सुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ही एक शोकांतिका राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर गावास जाणाºया रस्त्याकडे पाहिल्यावर दिसून येते.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेले जैतापूर हे एक १०० घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव. गावात शेतकरी व शेतमजूरांची वस्ती, दोन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचे दिसून येत आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याची ओरड मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.जैतापूरला जाण्यासाठी भोयेगाव ते जैतापूर व नांदगाव (सूर्या) ते जैतापूर असे दोन रस्ते आहेत. परंतु या दोन्ही रस्ते अजूनही कच्चेस आहेत. रस्त्याची नेहमीच फक्त दुरुस्ती केली जाते. तीही काळी माती व दगड टाकून. परंतु या दोन्ही रस्त्याचे पक्के बांधकाम किंवा डांबरीकरणासाठी मात्र येथील नागरिक अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत.गावातून कोणत्याही कामासाठी बाहेरगावी जाणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते. बाजार असो, शेतातील माल विक्रीसाठी असो, शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे असो किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रत्येकवेळी रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागते. विद्यार्थ्यांना तीन किमीचा प्रवास पायदळ करावा लागत असून गावात प्रवासासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. मागील वर्षी रस्त्याच्या दुरुस्ती कामाची तक्रार केल्यानंतर कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले. परंतु कोणतीही मोठी कार्यवाही होऊन रस्त्याची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही. ही स्थिती कायम आहे.जैतापूर हे नांदगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असल्यामुळे विविध कागदपत्रांसाठी नांदगावला जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी सोईचा रस्ता नसल्यामुळे प्रवासी वाहतूक होत नाही. नाईलाजाने पायदळ जावे लागते. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची समस्या सोडवावी.- वंदना बेरड, सदस्य, ग्रा.पं.जैतापूर.