शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:42 IST

देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राजुरा-कोरपना सीमावर्ती भागातील गावे सुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ही एक शोकांतिका राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर गावास जाणाºया रस्त्याकडे पाहिल्यावर दिसून येते.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेले जैतापूर हे एक १०० घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव. गावात शेतकरी व शेतमजूरांची वस्ती, दोन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचे दिसून येत आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याची ओरड मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.जैतापूरला जाण्यासाठी भोयेगाव ते जैतापूर व नांदगाव (सूर्या) ते जैतापूर असे दोन रस्ते आहेत. परंतु या दोन्ही रस्ते अजूनही कच्चेस आहेत. रस्त्याची नेहमीच फक्त दुरुस्ती केली जाते. तीही काळी माती व दगड टाकून. परंतु या दोन्ही रस्त्याचे पक्के बांधकाम किंवा डांबरीकरणासाठी मात्र येथील नागरिक अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत.गावातून कोणत्याही कामासाठी बाहेरगावी जाणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते. बाजार असो, शेतातील माल विक्रीसाठी असो, शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे असो किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रत्येकवेळी रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागते. विद्यार्थ्यांना तीन किमीचा प्रवास पायदळ करावा लागत असून गावात प्रवासासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. मागील वर्षी रस्त्याच्या दुरुस्ती कामाची तक्रार केल्यानंतर कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले. परंतु कोणतीही मोठी कार्यवाही होऊन रस्त्याची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही. ही स्थिती कायम आहे.जैतापूर हे नांदगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असल्यामुळे विविध कागदपत्रांसाठी नांदगावला जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी सोईचा रस्ता नसल्यामुळे प्रवासी वाहतूक होत नाही. नाईलाजाने पायदळ जावे लागते. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची समस्या सोडवावी.- वंदना बेरड, सदस्य, ग्रा.पं.जैतापूर.