शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘जय’चे सर्च आॅपरेशन, ‘त्या’ तीन बछड्यांचे काय ?

By admin | Updated: October 5, 2016 00:50 IST

उमरेड-कन्हांडला अभ्यारण्यातील बेपत्ता वाघ ‘जय’ ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असली...

घनश्याम नवघडे नागभीडउमरेड-कन्हांडला अभ्यारण्यातील बेपत्ता वाघ ‘जय’ ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असली तरी गेल्या २५ दिवसांपासून या तालुक्यातील बेपत्ता असलेल्या त्या मृत वाघिणीच्या तीन पिलांचे काय झाले? जयप्रमाणेच या पिलांचेसुद्धा ‘सर्च आॅपरेशन’ करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आशिया खंडातील प्रमुख वाघांमध्ये समावेश असलेला जय वाघ बेपत्ता होताच संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. ही दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून वन विभाग गेल्या तीन दिवसांपासून जयचा राज्यपातळीवर शोध घेत आहे. नागभीड तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या मिंडाळा कंपार्टमेंटमधून ३ सप्टेंबरपासून एका मृत वाघिणीचे तीन पिले बेपत्ता आहेत. या बेपत्ता पिलांचा वन विभागाचे विविध विभाग गेल्या २५ दिवसांपासून शोध (?) घेत असले तरी त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.मिंडाळा कंपार्टमेंटमधील सावंगी जंलगातून बेपत्ता असलेल्या या ुपिलांचे वय जेमतेम सात ते आठ महिन्यांचे आहे. त्यांची आई या जंलगात मृतावस्थेत आढळून आली. ते स्वत: शिकार करु शकत नाही. त्यांची भ्रमणक्षमताही तीन ते चार कि.मी. च्या पलिकडे जात नाही, असे जाणकारांचे मत आहे. मग हे पिले गेली कोठे, असा सवाल निर्माण झाला आहे.याबाबत मध्यंतरी ‘लोकमत’ ने वन विकास महामंडळातील अधिकाऱ्यांना अनेकदा विचारणा केली. प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच ‘आमचा तपास सुरू आहे’, मिळत असते. जय परिपूर्ण वाघ होता. दिवसासाठी जयची भ्रमणक्षमता ६० ते ७० किमी होती. तो कुठेही जावू शकतो. त्याची ही क्षमता लक्षात घेवूनच शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील जंगल सर्च करण्याचे आदेश दिले. पण या पिलांचे तसे नाही. ती पिले फार तर ५०-६० कि.मी. परिसरात भ्रमण करीत असतील.आता तर बहुतेक जंगल परिसरात अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. गेल्या २५ दिवसांत एकही पिल्लू कॅमेरामध्ये ट्रॅप कसे काय झाले नाही, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभाग पिले जिवंत असल्याचे भासवून व शोधमोहीम राबवून त्यावर करीत असलेला शासकीय मनुष्यबळाचा अपव्यय फाजीलपणाचा असल्याच्या प्रतिक्रिया या परिसरात व्यक्त होत आहेत.जय मरण पावला आहे की, जिवंत आहे, यावरुन संपूर्ण देशात रान उठले आहे. मात्र गेल्या २५ दिवसांपासून या तालुक्यातील वाघाचे तीन पिले गायब आहेत. त्यांचा कुठलाही मागमूस नाही. ते मरण पावले की, जिवंत आहेत, याचा जाब जयप्रमाणेच विचारण्याची गरज असून वनविभागाने याचा खुलासा करण्याची मागणी आहे.