शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’चे सर्च आॅपरेशन, ‘त्या’ तीन बछड्यांचे काय ?

By admin | Updated: October 5, 2016 00:50 IST

उमरेड-कन्हांडला अभ्यारण्यातील बेपत्ता वाघ ‘जय’ ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असली...

घनश्याम नवघडे नागभीडउमरेड-कन्हांडला अभ्यारण्यातील बेपत्ता वाघ ‘जय’ ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असली तरी गेल्या २५ दिवसांपासून या तालुक्यातील बेपत्ता असलेल्या त्या मृत वाघिणीच्या तीन पिलांचे काय झाले? जयप्रमाणेच या पिलांचेसुद्धा ‘सर्च आॅपरेशन’ करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आशिया खंडातील प्रमुख वाघांमध्ये समावेश असलेला जय वाघ बेपत्ता होताच संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. ही दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून वन विभाग गेल्या तीन दिवसांपासून जयचा राज्यपातळीवर शोध घेत आहे. नागभीड तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या मिंडाळा कंपार्टमेंटमधून ३ सप्टेंबरपासून एका मृत वाघिणीचे तीन पिले बेपत्ता आहेत. या बेपत्ता पिलांचा वन विभागाचे विविध विभाग गेल्या २५ दिवसांपासून शोध (?) घेत असले तरी त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.मिंडाळा कंपार्टमेंटमधील सावंगी जंलगातून बेपत्ता असलेल्या या ुपिलांचे वय जेमतेम सात ते आठ महिन्यांचे आहे. त्यांची आई या जंलगात मृतावस्थेत आढळून आली. ते स्वत: शिकार करु शकत नाही. त्यांची भ्रमणक्षमताही तीन ते चार कि.मी. च्या पलिकडे जात नाही, असे जाणकारांचे मत आहे. मग हे पिले गेली कोठे, असा सवाल निर्माण झाला आहे.याबाबत मध्यंतरी ‘लोकमत’ ने वन विकास महामंडळातील अधिकाऱ्यांना अनेकदा विचारणा केली. प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच ‘आमचा तपास सुरू आहे’, मिळत असते. जय परिपूर्ण वाघ होता. दिवसासाठी जयची भ्रमणक्षमता ६० ते ७० किमी होती. तो कुठेही जावू शकतो. त्याची ही क्षमता लक्षात घेवूनच शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील जंगल सर्च करण्याचे आदेश दिले. पण या पिलांचे तसे नाही. ती पिले फार तर ५०-६० कि.मी. परिसरात भ्रमण करीत असतील.आता तर बहुतेक जंगल परिसरात अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. गेल्या २५ दिवसांत एकही पिल्लू कॅमेरामध्ये ट्रॅप कसे काय झाले नाही, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभाग पिले जिवंत असल्याचे भासवून व शोधमोहीम राबवून त्यावर करीत असलेला शासकीय मनुष्यबळाचा अपव्यय फाजीलपणाचा असल्याच्या प्रतिक्रिया या परिसरात व्यक्त होत आहेत.जय मरण पावला आहे की, जिवंत आहे, यावरुन संपूर्ण देशात रान उठले आहे. मात्र गेल्या २५ दिवसांपासून या तालुक्यातील वाघाचे तीन पिले गायब आहेत. त्यांचा कुठलाही मागमूस नाही. ते मरण पावले की, जिवंत आहेत, याचा जाब जयप्रमाणेच विचारण्याची गरज असून वनविभागाने याचा खुलासा करण्याची मागणी आहे.