शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘जागो ग्राहक जागो’ : ९० टक्के निकाल ग्राहकांच्या बाजूने

By admin | Updated: May 2, 2015 01:03 IST

बाजारात जाऊन मनसोक्त खरेदी केल्यानंतर त्या गोष्टींचा आनंद घेताना लक्षात येते की, त्या वस्तूमध्ये काही दोष आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरबाजारात जाऊन मनसोक्त खरेदी केल्यानंतर त्या गोष्टींचा आनंद घेताना लक्षात येते की, त्या वस्तूमध्ये काही दोष आहे. नुसती धुसफूस करून उपयोग नसतो; पण काय करावे हेही कळत नाही. मात्र जागृत ग्राहक असाल तर अशावेळी ग्राहक न्यायालयाचा फायदा होऊ शकतो. अशाच जागृत ग्राहकांनी तक्रार केल्याने त्यांना न्याय मिळाला आहे. होय, गत पाच वर्षात जिल्ह्यातील ७९२ ग्राहकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार ग्राहक मंचाकडे केली. यातील ५७० ग्राहकांना मोबदल्यासह न्याय मिळाला आहे.ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय व्हावे यासाठी हा कायदा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आले. ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच त्याला योग्य तो न्याय, योग्य त्या वेळेत मिळावा हा ग्राहक मंच स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. आता तर ग्राहक मंचाची व्याप्ती वाढविण्यात आली असून वैद्यकीय सेवा, डॉक्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर तसेच सर्व प्रकारच्या विमा कंपन्या, टेलिफोन कंपन्या, रेल्वे, मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या या ग्राहक मंचाच्या कक्षेत येतात. त्यामुळे कोणत्याही वस्तूची खरेदी केली किंवा कोणत्याही सेवेचा लाभ घेताना पाच पैश्याचीही फसवणूक झाली, तरी ग्राहकाला ग्राहक मंचाकडे न्याय मागण्याची मुभा आहे. मात्र यात तक्रार वैयक्तिक आकसापोटी तक्रार केल्यास तक्रारदारालाच दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या प्रकरणात करा तक्रार सदोष किंवा असुरक्षित वस्तू, दुचाकीचे कमी मायलेज, गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून जीवित व वित्त हानी होणे, सेवेतील उणिवांसदर्भात वरातीतील बँड पथक, बँक, विमा कंपनी, कुरिअर सेवा, पोस्ट, टेलिफोन, वाहतूक अशा सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या कामकाजातील उणिवा तसेच डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्ण कायमचा अपंग झाला, कोचिंग क्लासमध्ये नियमित वर्ग घेतले गेले नाहीत, विजेच्या दाबातील चढउतारांमुळे उपकरणांचे नुकसान, रेल्वे प्रवासात आरक्षित डब्यात सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने सामान चोरीला गेले, वस्तूवरील छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणे अशा बाबतीत आपण तक्रार करता येते.अशी करता येईल तक्रार स्वत:च्या शब्दांत, आवश्यक तपशिलासह साध्या कागदावर लेखी तक्रार करता येते. अर्जासोबत काही शुल्क द्यावे लागते. तक्रारदाराने वकील नेमणे आवश्यक नाही; मात्र वकिलांना मज्जावही नाही. सोबत पुरावे जोडावे लागतात. खरेदीची पावती, हमीपत्र, सेवेबाबतचे करार-पत्र, तक्रारीसंदभार्तील पत्रव्यवहार, जाहिरातीचे कात्रण, आवश्यक तेथे तज्ज्ञांचे मत इत्यादींच्या झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतात. असे होते तक्रार निवारण तक्रारीची प्रत व नोटीस मंचाकडून विरुद्ध पक्षाला पाठविली जाते. विशिष्ट मुदतीत त्यांनी उत्तर न दिल्यास एकतर्फी निकाल दिला जातो; मात्र उत्तर देऊन त्यांनी तक्रार नाकारल्यास त्या वादावर सुनावणी होते. उपलब्ध पुरावे आणि दोन्ही पक्षांनी केलेले युक्तिवाद यांच्या आधारे निर्णय दिला जातो. कोणत्याही पक्षाच्या विनंतीवरून फक्त एकदाच सुनावणी पुढे ढकलता येते. विरुद्ध पक्षाला नोटीस दिल्यापासून ९० दिवसांत प्रकरण निकालात काढणे अपेक्षित आहे.