शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

लघु उद्योजकांकडून स्टॅम्प ड्युटी वसूल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:10 IST

नवीन लघु उद्योग उभारताना उद्योजकांकडून स्टॅम्प ड्युटी न घेण्याचे उद्योग विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. काही वर्षे याची अंमलबजावणीही झाली. ही सवलत नव्याने सुरू ठेवून उद्योजकांना पाठबळ देण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, उद्योग विभागाने काढलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेऊन स्टॅम्प ड्युटी वसूल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील नवी लघु उद्योजकांमध्ये धास्ती निर्माण झाली.

ठळक मुद्देनवीन लघु उद्योजक धास्तावले : जिल्ह्यातील उद्योगांची संख्या घटणार

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवीन लघु उद्योग उभारताना उद्योजकांकडून स्टॅम्प ड्युटी न घेण्याचे उद्योग विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. काही वर्षे याची अंमलबजावणीही झाली. ही सवलत नव्याने सुरू ठेवून उद्योजकांना पाठबळ देण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, उद्योग विभागाने काढलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेऊन स्टॅम्प ड्युटी वसूल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील नवी लघु उद्योजकांमध्ये धास्ती निर्माण झाली. ही समस्या सोडविली नाही तर लघु उद्योजकांची संख्या पुन्हा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.लघु उद्योगांना बळकटी देण्याकरिता १ एप्रिल २०१३ रोजी सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. यानुसार नवीन उद्योग उभारताना उद्योजकांकडून स्टॅम्प ड्युटी न घेण्याचे शासनाने ठरविले. परिणामी, जिल्हास्तरावरही याची अमलबजावणी केल्या जात होते. या करामध्ये व्हॅट व जीएसटी सारख्या विविध करांचा समावेश करण्यात आला होता.या योजनेची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपल्याने नवीन निर्णयाकडे जिल्ह्यातील लघु उद्योजकांचे लक्ष लागले होते. लघु उद्योजकांना ऊर्जितावस्था आल्यास नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामधून आर्थिक विकासाचा वेग वाढेल, हा हेतू पुढे ठेवून सवलतीची जुनीच योजना पुन्हा लागू होईल, असा शासन निर्णय जारी झाला. त्यामुळे औद्योगिक वसाहत आणि अन्य ठिकाणी नव्याने लघुउद्योग सुरू करणाºयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, संबंधित अधिकाºयांनी काही उद्योजकांना स्टॅम्प ड्युटीसंदर्भात नोटीसा बजावल्या. या कार्यवाहीमुळे सवलत योजना बाजूला ठेवल्याचा आरोप लघु उद्योजकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात आधीच लघुउद्योगांची संख्या २० ते २५ एवढीच आहे. नवीन लहान उद्योग उभारण्यासाठी काही उद्योजक तयार होत आहेत तर दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी सवलतीचा जुना निर्णय बदलविण्याच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.दोन विभागात मतभिन्नतानवीन उद्योग सुरू करताना कारखान्याची जमीन व बांधकाम असे मिळून सात टक्के स्टॅम्प ड्युटी लागते. हा कर माफ करण्यात आला होता. परंतु, जोवर शासनाचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत २०१३ च्या आधीचा आदेश लागू राहील, अशी माहिती अधिकारी देत आहेत. नवीन बांधकाम करताना उद्योजकांना स्टॅम्प ड्युटीचे पैसे भरले तर ते परत मिळणार नाही, असे महसूल विभागाचे अधिकारी सांगत आहे. या मतभेदांमुळे जिल्ह्यातील नवीन लघु उद्योजकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात आधीच लघु उद्योजकांची संख्या कमी आहे. शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. बँकांनी काही युवकांना कर्ज दिल्याने ते व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी शासनाने लघु उद्योजकांना संजीवनी देणाºया धोरणांकडे लक्ष दिले पाहिजे.-हेमंत सव्वालाखे, युवा लघु उद्योजक चंद्रपूर