शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
5
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
6
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
7
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
8
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
9
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
10
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
11
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
12
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
13
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
14
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
15
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
16
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
17
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
18
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
19
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
20
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांशी संवाद साधूनच विकास शक्य

By admin | Updated: November 30, 2014 23:02 IST

गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास

ब्रह्मपुरी : गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास व भावी वाटचाल करणे शक्य आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयच्या वतीने महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयीन संचालक मंडळींशी, प्राचार्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर ने.हि. शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या, सहसचिव अ‍ॅड. भास्करराव उराडे, डॉ.पी.एम. डोळस, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार-समन्वयक नागपूर विभागाचे प्रभारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ.डी.ए. पारधी, विज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. अमीर धम्मानी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विविध संस्थांचे सन्माननिय पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता. चर्चासत्राची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी मदनगोपालजी भैय्या यांना मालार्पण करून तसेच विद्यापीठ गीताने झाली. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचा ने.हि. महाविद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाचे वय अवघे तीन वर्षाचे आहे. विद्यापीठासमोर अनेक समस्या असून प्राधिकरण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणूनच या समस्येवर मात करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी संवाद साधून व अनावश्यक नियम व अडथळे दूर करून विद्यापीठाचा विकास व भावी वाटचाल करणे शक्य आहे. विद्यापीठाचे वय अवघे तीन वर्षांचे आहे. विद्यापीठासमोर अनेक समस्या असून प्राधिकरण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, असेही दीक्षित यांनी यावेळी स्पष्ट केले.याप्रसंगी कुलगुरुंनी उपस्थित विविध महाविद्यालयीन संस्थाचालक मंडळींशी, प्राचार्यांशी, प्राध्यापकांशी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. (तालुका प्रतिनिधी)