शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहर विकासाकरिता अतिक्रमण हटविणे आवश्यक

By admin | Updated: August 5, 2015 01:19 IST

चंद्रपूर शहराच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्या झालेल्या आहेत. कॉलन्यांमध्ये ओपन स्पेससुद्धा आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्या झालेल्या आहेत. कॉलन्यांमध्ये ओपन स्पेससुद्धा आहेत. शहराच्या विकासाकरिता बरेच कामे मंजूर केलेली आहेत. मात्र विकास कामे करीत असताना रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे काम मनपा प्रशासन करीत नाही. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून मनपाने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता संयुक्त विकास समिती मागील ३० वर्षापासून आंदोलने, मोर्चे, पत्रव्यवहार तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून मनपाचे आणि प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला निवेदने दिली आहेत. त्याची दखलसुद्धा घेण्यात आली आहे. मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे.पूरग्रस्त भागातील कॉलन्यातील सर्व रस्ते व नाल्या हे सिमेंट कॉक्रीटचे करणे गरजेचे आहे. शहरातील नगिनाबाग, रामनग, जगन्नाथबाबा नगर, रेव्हेन्यु कॉलनी, शेंडे लेआऊट, हरिओम नगर, सिस्टर कॉलनी, रहमत नगर, सुगम नगर, नगिनाबाग, प्रोफेसर कॉलनी, बुद्ध नगर वसाहत स्वावलंबीनगर, ठक्कर कॉलनी, गुलमोहर कॉलनी या परिसरातील अनेक रस्ते व नाल्या अजूपर्यंत सिमेंट काँक्रिटचे झालेल्या नाही. इरई नदीचे खोलीकरण, इरई नदीवरील पुलाचे बांधकाम, जगन्नाथ बाबानगर कडून स्वावलंबीनगरकडे इरई नदीकडे मिळणाऱ्या मोठ्या नाल्याचे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही. बिनबा गेट ते रामनगरकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. त्याचप्रमाणे जटपूरा गेट ते ठक्कर कॉलनीकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा मुख्य रस्ता, सवाली बंगला चौक ते हिस्लॉप कॉलेज पर्यंत झालेला नाही. सर्व कॉलन्यामधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण झालेले नाही. शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनाच्या वर्दळीमुळे कॉलनीत अनेक अपघात होत आहे. विकासाच्या आड येणाऱ्यांना प्रशासनाचा हिसका दाखविणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही. शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावरुन बहुतेक ठिकाणी अतिक्रमण वाढली आहेत. त्यामुळे मनपाने विकासाकरिता अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे, असे संयुक्त विकास समितीचे कार्याध्यक्ष शंकरराव सागोरे यांनी म्हटले आहे. शहराच्या विकासाबाबत प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष पांडुरंग गावतुरे, हिवराज गावंडे, भैया तोतडे, प्रा. अंबादास रायपुरे, शंकर कुंडले, प्रा. सुरेश विधाते, तुकाराम झाडे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पुराची समस्या कायम४चंद्रपूर शहरातील अनेक नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागतो. यावर अद्यापही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे. ईरई नदीचे पूर चंद्रपुरातील अनेक वॉर्डवासींना डोकेदुखीचे ठरत आहे. मात्र दरवर्षीच प्रशासन उपायोजना करण्यात अपयशी ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.