शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

उन्हामुळे लग्नकार्याला हजेरी लावणे कठीण

By admin | Updated: May 8, 2014 01:47 IST

मे महिन्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक आहे. उन्हाचा पारा आताच ४५ हून अधिक गेला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

बल्लारपूर: मे महिन्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक आहे. उन्हाचा पारा आताच ४५ हून अधिक गेला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रसंगी दुपारच्या लग्न कार्यात मुलाबाळांसह लग्नाला हजेरी कशी लावायची, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील जवळच्या लग्नाचे एकदाचे ठीक आहे. पण, बाहेरगावी या उन्हात जाणे कठीण झाले आहे. बसमध्ये गर्दी, धामाधूम होऊन, उड्या टाकीत जागा बळकाविण्याकरिता धक्के-बुक्के देत बसमध्ये प्रवेश करावा लागतो. काही जण बसच्या सीटवर बाहेरुन आधीच रुमाल टाकून ठेवतो. अनेकवेळा जागेसाठी वाद होतात. या सर्वांवर मात करीत प्रवाश करावा लागतो. कसा बसा प्रवास झाला की, लग्न मंडपी वरातीला येण्याला उशीर, सभागृहात पंखे, पाण्याची व्यवस्था असेल तर ठीक, अन्यथा, परत गरमीचा त्रास होतो. लग्नाला उशीर म्हणजे जेवणाला उशीर होतो. जेवण घेण्याकरिता तुंबड गर्दी, या गर्दीत जे मिळाले न मिळाले ते घ्या आणि कसे बसे जेवण आटपा असा सर्व आटापिटा करावा लागतो.सारे थकलेले चेहरे- सायंकाळ झाली तरी, उकाळा कायम असतो. नकोत अशी लग्न असा हुंकार सध्या महिलांमध्ये निघत आहे. आपण नाही गेलो तर आपल्या घरी लग्न कार्यात कोण येणार, या भीतीपोटी लग्न कुठेही असो, प्रवास कठीणचा आहे हे माहीत असतांनाही मुलाबाळांसह जावेच लागते. या महिन्यात १२ तारखेला लग्नाचा मोठा ठोक आहे. गावोगावी, बसस्थानक आणि रस्त्यांवर लग्न मंडपी जाणार्‍यांची घाईदिसणार आहे. हा पूर्ण महिनाच लग्नाचा आहे आणि कडक उन्हाचाही!(तालुका प्रतिनिधी)