शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीदशेतही ‘तो’ ठरतोेयं युवकांसाठी प्रेरणादायी

By admin | Updated: January 11, 2015 22:48 IST

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

रत्नाकर चटप - नांदाफाटाआयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशीच प्रेरणा बिबी येथील अविनाश पोईनकर (२२) यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना आज मिळत आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेला अविनाश डीएडची पदवी घेऊन सध्या चंद्रपूर येथे बी.ए. अंतीम वर्षाचे शिक्षण घेत आहे. वस्तीगृहात राहून आणि खाजगी कार्यालयात काम करुन तो शिक्षण घेत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत आहे. लहानपणापासून कविता लिहण्याचा छंद असलेल्या अविनाशने या क्षेत्रात आज मजल मारली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, राष्ट्रसंत विचारकृती साहित्य संमेलन आदी साहित्य संमेलनातून त्याने साहित्यक्षेत्रात आज मोठी उंची गाठली आहे. त्याचबरोबर जिल्हा व राज्यस्तरावरील विविध कविसंमेलनातून त्याने आपल्या साहित्याची छाप सोडली आहे. याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून बीबी गावात सेवार्थ ग्रुप ही सामाजिक संघटना बांधली. या माध्यमातून ग्रामस्वच्छता राबविणे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना पुरस्कार देणे, वृक्षारोपण, व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक संस्थांनी पुरस्कारही दिले आहे. यामध्ये सिंबायसेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणेचा ‘महाराष्ट्राचा मराठी वाचक’ पुरस्कार २०१२, तुकोबाराम काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, नवांकुर साहित्य पुरस्कार, विदर्भस्तरीय वक्तृत्व पुरस्कार, वर्धा येथील आदर्श विद्यार्थी पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. साहित्याच्या सोबत अविनाशने वक्तृत्व, वादविवाद, संचालन आदी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विविध बक्षिसे प्राप्त केली आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून अनेक वृत्तपत्र, नियतकालिके, दिवाळी अंकातून त्याच्या कविता आणि साहित्य प्रकाशित झाले असून आजही हे कार्य सुरुच आहे. गावरानातील कविता, काव्यपुष्प, अक्षरवैदर्भी, सत्याग्रही विचारधारा, अंकुर, अक्षरवेल आदी काव्यसंग्रह व मासिकातून कवितेचे प्रकाशन झाले आहे. त्यामुळे आज कोरपना तालुक्यातील अनेक युवकांना प्रेरणा देऊन वाचन व लिखाण संस्कृतीला समृद्ध करण्याचे धडे देण्याचे कार्य अविनाश करीत आहे.