शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:32 IST

नागभीड : शहरातून होणारी जड वाहतूक बंद करण्याचा ठराव १४ सप्टेंबर २०१८ रोजीच घेण्यात आला. या बाबीस आता तीन ...

नागभीड : शहरातून होणारी जड वाहतूक बंद करण्याचा ठराव १४ सप्टेंबर २०१८ रोजीच घेण्यात आला. या बाबीस आता तीन वर्ष झाले आहेत. मात्र या ठरावाची अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेऊन नगर परिषदेने हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.

नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय शहरात तीन महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक विद्यालये, प्राथमिक शाळा, कॉन्व्हेंट आहेत. हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सायकलने शाळा-महाविद्यालयात येत असतात. शाळा सुरू होण्याच्या अगोदर आणि सुटायच्या वेळी या जड वाहनाने वाहतूक चांगलीच प्रभावित होत असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक प्रतिष्ठाने बंद आहेत. नाही तर या अडचणीत आणखी भर पडली असती. मात्र शाळा सुरू होताच ही समस्या निश्चित ऐरणीवर येणार आहे.

शहरात वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पण रस्ते आपले अस्तित्व हरवून बसले आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेड उभारणी करून त्यातच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यातच मोठ्या व्यापाऱ्यांची जड वाहने शहरात येत आहेत. वाहनातून साहित्य उतरविण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील नियमित होणारी वाहतूक प्रभावित होत आहे. दोन वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. शहरातील जड वाहतूक बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून केल्या जात होती.

कोट

शहरातील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात प्रहार संघटनेने नगर परिषदेला अनेकदा निवेदने दिली आहेत. एकदा ठरावाची होळी केली. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. पण काहीच निष्पन्न झाले नाही. प्रहार हा प्रश्न पुन्हा हाती घेणार आहे.

- वृषभ खापर्डे, प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड.

110921\img_20210908_145823.jpg

शहरात वाहतुकीची अशी कोंडी निर्माण होते.